अ‍ॅपशहर

‘साहित्यनिर्मितीसाठी युवांनी पुढे यावे’

राष्ट्रसंतांचे विविध स्वरुपातील साहित्य उपलब्ध आहे. संबंधित साहित्याचा प्रत्यक्ष प्रचार, प्रसार व वैचारिक परिवर्तनाकरिता छंद, राग, वृत्त, अलंकार याबद्दल तरुणांनी पुढे येऊन लेखन करावे. यातून खऱ्या अर्थाने साहित्यनिर्मिती व समाजसेवा घडेल, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष झाडीबोलीचे अभ्यास डॉ. हरीशचंद्र बोरकर यांनी केले.

Maharashtra Times 15 Oct 2017, 4:30 am
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gadchiroli rashtrasant sahitya sammelan concludes
‘साहित्यनिर्मितीसाठी युवांनी पुढे यावे’


राष्ट्रसंतांचे विविध स्वरुपातील साहित्य उपलब्ध आहे. संबंधित साहित्याचा प्रत्यक्ष प्रचार, प्रसार व वैचारिक परिवर्तनाकरिता छंद, राग, वृत्त, अलंकार याबद्दल तरुणांनी पुढे येऊन लेखन करावे. यातून खऱ्या अर्थाने साहित्यनिर्मिती व समाजसेवा घडेल, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष झाडीबोलीचे अभ्यास डॉ. हरीशचंद्र बोरकर यांनी केले.

गडचिरोली येथील सामुदायिक प्रार्थना मंदिरातील कर्मयोगी तुकारामदादा साहित्यनगरीत शनिवारी राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, विलासराव उगे, शंकरराव दरेकर, उत्तमराव गेडाम, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, दलित मित्र नाना वाढई, केशवराव दशमुखे, गांधीवादी विचारवंत संदीप कटकुवार आदी उपस्थित होते.

डॉ. बोरकर म्हणाले, राष्ट्रसंतांच्या साहित्यशास्त्रावर गुरुदेवभक्तांनी अद्याप पाहिजे त्या प्रमाणात लेखन केलेले नाही. त्याकरिता दृष्टी लागते. तरुणांनी साहित्य लेखन केल्यास तो खरा ठेवा ठरेल. तसेच अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम गुरुदेवभक्तांनी करावे. अथक परिश्रम घेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या कार्याची पावती ही साहित्य संमेलन आहे, असेही त्यांनी सांगितले.

बंडोपंत बेढेकर यांनी राष्ट्रसंत साहित्याचे महत्व सांगताना राष्ट्रसंताच्या विचाराने प्रबुद्ध माणसांचा समाज निर्माण व्हावा आणि राष्ट्रोन्नतीच्या उपयोगी पडावे, असे मत मांडले. प्रंचित पोरेड्डीवार यांनी स्वतःच्या जगण्यातून इतरांना मोठे करणारा जगातील सर्वात प्रामाणिक व्यक्ती आहे, अस मत व्यक्त केले. संचालन अॅड. सारिका जेनेकर यांनी तर आभार पंडित पुडके यांनी मानले.

या संमेलनाच्या चळवळीत योगदान देणाऱ्या संजय वैद्य, विलास उगे, डॉ. जयस्वाल, सतीश लोंढे, अॅड. जेनेकर, अरविंद वासेकर, प्रा संदीपान जोशी आदींचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी झालेल्या परिसंवादात ‘राष्ट्रसंतांच्या साहित्याचा माझ्यावरील प्रभाव’ यात राजकुमार बुमनर, रुपचंद दखने, उत्तम पानघाटे, मारोती साव, माणिक बेलूरकर, रामराव मोहुर्ले, सयाम गुरुजी, प्रेमलाल पारधी यांनी विचार मांडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज