मेळघाटातील होळीचा रंग वेगळा!
सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होतो. सलग पाच दिवस आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात.
Maharashtra Times 1 Mar 2018, 2:03 pm
शैलेश धुंदी, अमरावती
सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होतो. सलग पाच दिवस आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. विविध कार्यक्रम व रंगांची उधळण करण्यासोबत निसर्गाच्या आराधनेला महत्त्व देत असतात.
मेळघाटातील होळीच्या पूर्वसंध्येला सुरुवात होते. रोजगारांसाठी भटकंती करणारा आदिवासी बांधव मूळ गावी परततो. पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन होते. एकाच दिवशी सर्व गावात होलिका दहन केले जाते. घराघरात होळी पूजन करताना गावात एकत्रित व मोठी होळी पेटविली जाते. छोटी व मोठी अशी दोन प्रकारची होळी पेटविली जाते. यासाठी जंगलातून हिरवे बांबू आणून उभारण्यात येते. सायंकाळी गावातील पोलिस पाटेल किंवा आडा पटेल सपत्निक होळीची पूजा करतात. होळी पेटल्यानंतर लहान मोठ्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतात. होलिकादहनामुळे वर्षभर आनंद व सुखाचे वातावरण राहते, अशी आदिवासींची मान्यता आहे.
आदिवासी एकमेकांमधील हेवेदावे, भेदभाव विसरून या दिवशी एकत्र येत असतात. मुला-मुलींचे लग्नदेखील जोडले जातात. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करतात. गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारला जातो. मेघनाथ आदिवासींचे दैवत असल्याने त्याचे पूजन केले जाते. मोहफुलापासून तयार करण्यात आलेल्या मद्याचे आदिवासी सेवन करून आनंदोत्सव साजरा करतात. किनकी, ढोलकी व बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होवून नृत्य करतात. होळीला गोड पुरी, मासळी व गोड भात आदी पदार्थाची मेजवानी असते. होळीसाठी मेळघाटातील चारा, कोर या गावात मोठ्या यात्रादेखील भरत असतात. सायंकाळी होळी पेटविल्यानंतर त्यात नवसाचे नारळ चढविले जातात.
आदिवासींची होळी सलग पाच दिवस चालत असते. पंचमीच्या दिवशी जेरी खंबा हा कार्यक्रम होतो. एका उंच खांबाला तेल लावून जमिनीवर ठेवले जाते. जवळपास २० फुटाच्या या खांबावर नारळ बांधण्यात येते. गावातील तरूण मुले खांबावर चढून नारळ तोडण्याचा प्रयत्न करतात. खांबावर चढणाऱ्या प्रत्येकास आदिवासी महिला लाकडी फळीने मारून अटकाव करते. परंतु सर्व विरोध झुगारून नारळ आणणाऱ्यास विजयी घोषित करण्याची पूर्वापार प्रथा आहे. होळीमध्ये आदिवासी गमतीने एकमेकांवर ताशेरे ओढतात. यात वहिनी, दीर व मामा तसेच भाचा यांचा समावेश असतो. सातुपडा पर्वत रांगातून तापी नदी वाहत असून आदिवासी नदीचे पूजन करतात. होळीनिमित्त मेळघाटातील काराकोट या गावी मेघनाथ यांची यात्रा भरते. राजा मोहन रॉय यांच्या नावाने याठिकाणी जेरी खांबदेखील उभारल्या जातो.
जात पंचायतीमधून कर्ज
मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी जात पंचायत वर्षानुवर्षापासून चालत आलेली आहे. जात पंचायतीमधून होळीच्या दिवशी कर्ज वितरित केले जाते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कर्जाची टक्केवारी आखली जाते. होळीला दिलेले कर्ज होळीच्याच दिवशी परत करण्याची प्रथा आहे. मुलामुलीचे लग्न, व्यवहार व शेतीसाठी कर्ज दिले जाते. याठिकाणी गोळा झालेला पैसा येथूनच कर्जस्वरूपात वितरित करण्यात येतो. त्यामुळे हिशेबाच्या वहीखेरीज पैसा जमा राहत नाही.
फगव्याचे आकर्षण कायम
मेळघाटातील आदिवासींमध्ये आजही फगवा मागण्याचे आकर्षण आहे. आदिवासी बांधव होळी पेटल्यानंतर गावातील मोठ्या व प्रतिष्ठांकडे जावून फगवा मागतात. रस्त्यावर वाहने अडवून फगवा मागितला जातो. होळीच्या काळात पाच दिवस फगवा अर्थात पैसे मागितले जातात फगवा मागताना आदिवासी विशिष्ट गीत गात असतात. फगव्यातून जमा झालेल्या रकमेतून गावाबाहेर शेतात सामूहिक वनभोज ठेवण्यात येत असतो.
सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होतो. सलग पाच दिवस आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. विविध कार्यक्रम व रंगांची उधळण करण्यासोबत निसर्गाच्या आराधनेला महत्त्व देत असतात.
मेळघाटातील होळीच्या पूर्वसंध्येला सुरुवात होते. रोजगारांसाठी भटकंती करणारा आदिवासी बांधव मूळ गावी परततो. पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन होते. एकाच दिवशी सर्व गावात होलिका दहन केले जाते. घराघरात होळी पूजन करताना गावात एकत्रित व मोठी होळी पेटविली जाते. छोटी व मोठी अशी दोन प्रकारची होळी पेटविली जाते. यासाठी जंगलातून हिरवे बांबू आणून उभारण्यात येते. सायंकाळी गावातील पोलिस पाटेल किंवा आडा पटेल सपत्निक होळीची पूजा करतात. होळी पेटल्यानंतर लहान मोठ्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतात. होलिकादहनामुळे वर्षभर आनंद व सुखाचे वातावरण राहते, अशी आदिवासींची मान्यता आहे.
आदिवासी एकमेकांमधील हेवेदावे, भेदभाव विसरून या दिवशी एकत्र येत असतात. मुला-मुलींचे लग्नदेखील जोडले जातात. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करतात. गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारला जातो. मेघनाथ आदिवासींचे दैवत असल्याने त्याचे पूजन केले जाते. मोहफुलापासून तयार करण्यात आलेल्या मद्याचे आदिवासी सेवन करून आनंदोत्सव साजरा करतात. किनकी, ढोलकी व बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होवून नृत्य करतात. होळीला गोड पुरी, मासळी व गोड भात आदी पदार्थाची मेजवानी असते. होळीसाठी मेळघाटातील चारा, कोर या गावात मोठ्या यात्रादेखील भरत असतात. सायंकाळी होळी पेटविल्यानंतर त्यात नवसाचे नारळ चढविले जातात.
आदिवासींची होळी सलग पाच दिवस चालत असते. पंचमीच्या दिवशी जेरी खंबा हा कार्यक्रम होतो. एका उंच खांबाला तेल लावून जमिनीवर ठेवले जाते. जवळपास २० फुटाच्या या खांबावर नारळ बांधण्यात येते. गावातील तरूण मुले खांबावर चढून नारळ तोडण्याचा प्रयत्न करतात. खांबावर चढणाऱ्या प्रत्येकास आदिवासी महिला लाकडी फळीने मारून अटकाव करते. परंतु सर्व विरोध झुगारून नारळ आणणाऱ्यास विजयी घोषित करण्याची पूर्वापार प्रथा आहे. होळीमध्ये आदिवासी गमतीने एकमेकांवर ताशेरे ओढतात. यात वहिनी, दीर व मामा तसेच भाचा यांचा समावेश असतो. सातुपडा पर्वत रांगातून तापी नदी वाहत असून आदिवासी नदीचे पूजन करतात. होळीनिमित्त मेळघाटातील काराकोट या गावी मेघनाथ यांची यात्रा भरते. राजा मोहन रॉय यांच्या नावाने याठिकाणी जेरी खांबदेखील उभारल्या जातो.
जात पंचायतीमधून कर्ज
मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी जात पंचायत वर्षानुवर्षापासून चालत आलेली आहे. जात पंचायतीमधून होळीच्या दिवशी कर्ज वितरित केले जाते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कर्जाची टक्केवारी आखली जाते. होळीला दिलेले कर्ज होळीच्याच दिवशी परत करण्याची प्रथा आहे. मुलामुलीचे लग्न, व्यवहार व शेतीसाठी कर्ज दिले जाते. याठिकाणी गोळा झालेला पैसा येथूनच कर्जस्वरूपात वितरित करण्यात येतो. त्यामुळे हिशेबाच्या वहीखेरीज पैसा जमा राहत नाही.
फगव्याचे आकर्षण कायम
मेळघाटातील आदिवासींमध्ये आजही फगवा मागण्याचे आकर्षण आहे. आदिवासी बांधव होळी पेटल्यानंतर गावातील मोठ्या व प्रतिष्ठांकडे जावून फगवा मागतात. रस्त्यावर वाहने अडवून फगवा मागितला जातो. होळीच्या काळात पाच दिवस फगवा अर्थात पैसे मागितले जातात फगवा मागताना आदिवासी विशिष्ट गीत गात असतात. फगव्यातून जमा झालेल्या रकमेतून गावाबाहेर शेतात सामूहिक वनभोज ठेवण्यात येत असतो.