अ‍ॅपशहर

सततच्या जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूरच्या शंभर लोकांनी थेट गावच सोडलं

दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवारी सकाळी (ता.२२) गाव सोडले असुन त्यांचा मुक्काम गावालगतच्या पाझर तलावावर असुन ते गावात परतणार नाही. त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी कळविले आहे.

Maharashtra Times 23 Oct 2021, 3:56 pm
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील अनुसुचित जातीच्या बांधवावर गावातील सवर्ण सतत जातीय अन्याय अत्याचार करीत आहे. त्यांच्या निषधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवारी सकाळी (ता.२२) गाव सोडले असुन त्यांचा मुक्काम गावालगतच्या पाझर तलावावर असुन ते गावात परतणार नाही. त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी कळविले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amravati news


चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील या बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदनच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. मात्र गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी चौघांवर अ‍ॅट्रोसिटीसह अन्य गुन्हे दाखल झालेले आहे .मात्र स्थानिक एसडीपीओंनी सदर प्रकरणच दाबुन टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सवर्णाचे मनोबल वाढले आणि त्यांनी दलित युवतींना त्रास देणे सुरू केले. या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मात्र दोन्ही प्रकरणात मात्र कार्यवाही केली नाही.

काँग्रेसमध्ये मनमानी! निलंबित पदाधिकाऱ्याचा उपोषणाचा इशारा; बाळासाहेब थोरातांवरही नाव न घेता आरोप
या अन्यायाविरूध्द दानापूरचे दहा दलित गावात आमरण उपोषणला बसले होते. त्यानंतर मोठ्या जीवाभावाने चांदूरच्या एसडीपीओमनी कार्यवाही केली. मात्र रस्ता अडवणुक प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आरोपी अद्यापही मोकाट आहेत असे दलीत बांधवांनी म्हटले. वहीवाटीच्या रस्त्यासाठी स्थानिक तहसीलदाराकडे २३/०७/२१ दाखल केसवर चार महिणे होऊनही निकाल लागलेला नाही. सततचा अन्याय, अत्याचार होऊनही न्याय मिळत नसल्याने दानापूरचे दलित व्यथीत झाले आहे. तर आरोपींना शासन-प्रशासनाकडून पाठबळ मिळाल्याने त्यांचे अन्याय अत्याचार वाढले. सोयाबीन काढण्यासाठी तात्पुरता रस्त्यासाठी या दलितांना तहसिलचे उंबरठे झिझवूनही न्याय मिळाला नाही.

अशातच १८ ऑक्टोबरला दानापूरच्या त्या कथीत सर्वणांनी निखिल चांदणे यांच्या शेतातील सोयाबीन जाळले. यातील संशईताची नावे देऊनही पोलिसांकडून ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप पुरूषोत्तम मोहोड यांनी केला आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी तळेगाव पो. स्टे., चांदूर रेल्वेचे एसडीओ, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक(ग्रा), तहसिलदार यांना दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज