अमरावती: समाज माध्यमांमुळे जग जवळ आलं असलं तरी संवाद मोठ्या प्रमाणात खुंटला आहे. याचे परिणाम अनेकदा दिसून येतात. याचाच प्रत्यय अमरावतीतील एका खेड्यात आला आहे. येथे इयत्ता नवव्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलींनी मला कोणी समजूनच घेत नाही, असे लिहत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (a girl studying in class ix committed suicide)
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एका १४ वर्षीय चिमुकलीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. मला कुणी समजून घेत नाही, असं लिहून तिने स्वतःला कायमच संपविल आहे. ओंकारखेडा गावात ही १४ वर्षीय तरुणी राहत असून ती नववीत शिक्षण घेत होती,आई वडील घरात कुणीही नसताना तिने राहत्या घरात गळफास लावला. आई वडील घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. क्लिक करा आणि वाचा- अमरावती हादरले!; २४ तासांत दोन पोलिसांनी आत्महत्या करत संपवले जीवन, कारण...
या नंतर तत्काळ तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं. डॉक्टरांनी मात्र तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसानी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तर या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे..पोलिसांनी मात्र युवतीने लिहलेली मृत्यू पूर्वी चिठ्ठी माध्यमांना देण्यास नकार दिला.
क्लिक करा आणि वाचा- कारागृहामागील झाडाला गळफास घेत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, अमरावतीत खळबळ
करोनानंतर जिल्ह्यात सातत्याने अपघात आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. चोवीस तासाच्या अंतरात जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. अशातच आज भावनाविवश झालेल्या इयत्ता नववीतील या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. मृत्यूपूर्वी मुलीने लिहिलेली सुसाईड नोट माध्यमांपासून दूर ठेवण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा यांचा घणाघाती आरोप
आता या सुसाईड नोटमध्ये नेमके काय दिले आहे यावरूनच आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एका १४ वर्षीय चिमुकलीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. मला कुणी समजून घेत नाही, असं लिहून तिने स्वतःला कायमच संपविल आहे. ओंकारखेडा गावात ही १४ वर्षीय तरुणी राहत असून ती नववीत शिक्षण घेत होती,आई वडील घरात कुणीही नसताना तिने राहत्या घरात गळफास लावला. आई वडील घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
या नंतर तत्काळ तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं. डॉक्टरांनी मात्र तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसानी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तर या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे..पोलिसांनी मात्र युवतीने लिहलेली मृत्यू पूर्वी चिठ्ठी माध्यमांना देण्यास नकार दिला.
क्लिक करा आणि वाचा- कारागृहामागील झाडाला गळफास घेत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, अमरावतीत खळबळ
करोनानंतर जिल्ह्यात सातत्याने अपघात आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. चोवीस तासाच्या अंतरात जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. अशातच आज भावनाविवश झालेल्या इयत्ता नववीतील या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. मृत्यूपूर्वी मुलीने लिहिलेली सुसाईड नोट माध्यमांपासून दूर ठेवण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा यांचा घणाघाती आरोप
आता या सुसाईड नोटमध्ये नेमके काय दिले आहे यावरूनच आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.