अ‍ॅपशहर

शराब छोडो, घर जोडो!

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातही मागणीने जोर धरला आहे. आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने दिलेले आश्वासन न ‌पाळल्याच्या निषेधात पारव्यात महिलांनी मोर्चा काढला. ‘शराब छोडो, बोतल तोडो, घर जोडो’ अशा घोषणा दिल्या. तर पांढरकवडा येथे आमदाराच्या घराला घेराव घालण्यात आला. आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

Maharashtra Times 30 Apr 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम leave liqure save house
शराब छोडो, घर जोडो!


चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातही मागणीने जोर धरला आहे. आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने दिलेले आश्वासन न ‌पाळल्याच्या निषेधात पारव्यात महिलांनी मोर्चा काढला. ‘शराब छोडो, बोतल तोडो, घर जोडो’ अशा घोषणा दिल्या. तर पांढरकवडा येथे आमदाराच्या घराला घेराव घालण्यात आला. आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी अनेक आंदोलने झाली. कळंब ते नागपूर हजारो महिलांनी पदयात्रा करत विधिमंडळावर धडक दिली. पण, सरकारने केवळ आश्वासन दिले. दारूबंदी झालीच नाही. आता पुन्हा महिला मोठ्या संख्येने दारूबंदी आंदोलनात उतरल्या आहेत. घाटंजी तालुक्यातील पारवा येथे शेकडो महिलांनी नायब तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन दारूबंदीची मागणी केली. स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानचे अध्यक्ष महेश पवार यांच्या नेतृत्वात हा महिलांचा मोर्चा निघाला होता. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा, युक्रांत पुणेचे संदीप बर्वे, वणी येथील राजू निमसटकर, दिलीप भोयर यांच्यासह स्वामिनीच्या असंख्य महिला या मोर्चात सहभगी होत्या. यावेळी महिलांच्या बरोबर पुरुषांनीही दारूबंदी आंदोलनात उतरण्याची गरज देसरडा यांनी व्यक्त केली. तर महेश पवार यांनी दारूबंदीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे सांगितले.

दारूबंदी आंदोलनाचे पडसाद पांढरकवड्यातही उमटले. स्वामिनीच्या शेकडो महिलांनी आमदार राजू तोडसाम यांच्या घराला घेराव घातला. गेल्या वर्षी दारूबंदीसाठी घाटंजी येथे निघालेल्या मोर्चाच्या वेळी राजू तोडसाम यांनी दारूबंदीसाठी मुख्यमंत्र्याकडे आपण मागणी करू व आंदोलनात सोबत राहू, असे आश्वासन दिले होते. पुढे त्यांनी काहीच केले नाही, असा आरोप स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानचे अध्यक्ष महेश पवार यांनी केला. आमदार तोडसाम घरी नसल्याने त्यांच्या पत्नी अर्चना तोडसाम यांना दारूबंदीबाबत निवेदन देण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यातही वाढतोय विरोध

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. पण, येथे मुबलक स्वरुपात दारू मिळत असल्याचे अलीकडच्या कारवायांमधून स्पष्ट होते. भामरागड येथे दारूबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी महिलांनी आंदोलन छेडले आहे. स्वत:च बसमधून होणारी दारू वाहतुकीचा पदार्फाशही केला होता. इतर ठिकाणीही महिला संघटित होऊ लागल्या आहेत. दारूबंदीच्या मागणीसाठी आंदोलने करीत आहेत. सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणीही करीत आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. चंद्रपुरातील दारूबंदीनंतर कौटुंबिक हिंसाचारात घट नोंदविण्यात आली आहे. त्याचा परिणाम इतर जिल्ह्यांमध्येही दिसावा म्हणून दारूबंदी लागू करावी नव्हे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही होऊ लागली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज