म. टा. प्रतिनिधी, नागपूर सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे एकेकाळी कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळातील शेतकऱ्यांनी हे पीक घेणे कमी केले आहे. मात्र, याच जिल्ह्यातील अमृत देशमुख या शेतकऱ्याने अभिनव प्रयोगातून एका एकरात तब्बल ५१ क्विंटल कापसाचे उत्पादन घेण्याचा भीमपराक्रम करुन दाखविला आहे. देशमुख यांना गवसलेले पांढऱ्या सोन्याचे हे इंगित हे आता ‘अमृत पॅटर्न’ म्हणून लोकप्रिय झाले असून अनेक राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आता अंबोड्याची वाट चालू लागले आहेत. गुरुवारी नागपुरात देशमुख यांनी शेतकरी तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांच्या यशोगाथा मांडली. कापसाच्या शेतीवर प्रयोग सुरू करण्यापूर्वी देशमुख यांच्या शेतात सात ते आठ क्विंटल कापूस होत असे. मात्र, आपल्या प्रयोगांच्या आधारे २०१३-१४ या वर्षी त्यांनी प्रति एकर तब्बल ५१ क्विंटल कापसाने उत्पन्न घेऊन विक्रम केला. कापसाचे वाण दर तीन वर्षांनी बदलावे लागते. शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टिकोनातून शेती केली तरच शेती परवडणारी ठरते. विद्यापीठे आणि सरकारी अधिकाऱ्यांचा पुस्तकी दृष्टिकोन शेतीला मारक ठरत आहे, असे देशमुख यांनी सांगितले. नांगरणीच्या पद्धतीत बदल, बियाण्यांची योग्य निवड, शेणखताला दिलेली रासायनिक खतांची जोड, पारंपरिक प्रक्रियेत केलेले बदल यामुळे ही उत्पादन वाढ झाली. शेतकऱ्यांनीही या पद्धती शिकून घेतल्यास केवळ कापूसच नव्हे तर इतर पिकांचेही उत्पादन वाढविण्यास मदत होईल, असे देशमुख म्हणाले.
शासकीय पातळीवर बेदखल विदर्भ, मराठवाडा, आंध्र, गुजरात व कर्नाटक येथील शेकडो शेतकरी आजवर अंबोडा येथे येऊन ‘अमृत पॅटर्न’बद्दल माहिती घेऊन गेले आहेत. अनेक शिबिरांमधून या प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत देशमुख यांनी पोचविली आहे. गेली सात ते आठ वर्षे मशागतीच्या आणि शेतीच्या या पद्धती वापरुन देशमुख भरमसाठ उत्पन्न घेत आहेत. मात्र, विद्यापीठ किंवा शासकीय पातळीवर त्यांच्या प्रयोगांची दखल अद्याप घेतली नाही. शेतकऱ्यांना सध्याच्याच खर्चात जास्त उत्पन्न देऊ शकणारा प्रयोग सरकारी पातळीवर मात्र दुर्लक्षित ठरला आहे.
कापसालाही ओढ सूर्याची सूर्याचे आकाशातील स्थान बदलते तशी सूर्यफुलाचीही दिशा बदलते, हे आपण ऐकले असते. मात्र, सूर्यफुलाचा हा गुणधर्म कापसातही असल्याचा दावा अमृत देशमुख यांनी केला आहे. सूर्यासमोर ढग आल्यास कापसाच्या झाडांच्या पानांची टोके या ढगांकडे होतात. तसेच कापसाच्या बोंडांचीही दिशा बदलते. सूर्यप्रकाश हा कापसाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कपाशीच्या सर्व पानांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा मिळेल याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, असेही देशमुख म्हणाले.
शासकीय पातळीवर बेदखल विदर्भ, मराठवाडा, आंध्र, गुजरात व कर्नाटक येथील शेकडो शेतकरी आजवर अंबोडा येथे येऊन ‘अमृत पॅटर्न’बद्दल माहिती घेऊन गेले आहेत. अनेक शिबिरांमधून या प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत देशमुख यांनी पोचविली आहे. गेली सात ते आठ वर्षे मशागतीच्या आणि शेतीच्या या पद्धती वापरुन देशमुख भरमसाठ उत्पन्न घेत आहेत. मात्र, विद्यापीठ किंवा शासकीय पातळीवर त्यांच्या प्रयोगांची दखल अद्याप घेतली नाही. शेतकऱ्यांना सध्याच्याच खर्चात जास्त उत्पन्न देऊ शकणारा प्रयोग सरकारी पातळीवर मात्र दुर्लक्षित ठरला आहे.
कापसालाही ओढ सूर्याची सूर्याचे आकाशातील स्थान बदलते तशी सूर्यफुलाचीही दिशा बदलते, हे आपण ऐकले असते. मात्र, सूर्यफुलाचा हा गुणधर्म कापसातही असल्याचा दावा अमृत देशमुख यांनी केला आहे. सूर्यासमोर ढग आल्यास कापसाच्या झाडांच्या पानांची टोके या ढगांकडे होतात. तसेच कापसाच्या बोंडांचीही दिशा बदलते. सूर्यप्रकाश हा कापसाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कपाशीच्या सर्व पानांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा मिळेल याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, असेही देशमुख म्हणाले.