अमरावती : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) अमरावती दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला ( Women's Hospital Amravati Fire ) भेट दिली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता कक्षाला आग लागली होती. यात ५ बालकांना किरकोळ इजा झाली आहे. त्यांना पंजाबराव देशमुख दवाखान्यात हलविण्यात आले आहे. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नाना पटोले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले. यावेळी माध्यमांशी बोलताना पटोले यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार निशाणा साधला.
भंडाऱ्या सारखी घटना होता होता राहिली. भंडाऱ्यासह इतर काही ठिकाणीही बालकांच्या वॉर्डमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या. अशा घटना होऊ नये आणि बालकांच्या सुरक्षेसाठी सरकारीकडे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. पण अजूनही सरकारी पातळीवर या बाबत अनास्था आहे. सरकार जागरूक नाहीए. अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना थांबवण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलली पाहिजेत, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे नाना पटोले म्हणाले.
मोठी बातमी : अमरावतीत बालकांच्या ICUमध्ये अचानक लागली आग; तातडीने दुसऱ्या वॉर्डात हलवले
पालकमंत्री स्पायडरमॅन सारखे काम करणार का?
राज्यात कालच जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले. सहा-सहा जिल्ह्याला एक-एक पालकमंत्री दिला गेला आहे. प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीचा आज समन्वय नाही. यामुळे ज्या काही घटना घडतात त्यात शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही. महाराष्ट्रात शासनच नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. लोकशाहीची ही थट्टा राज्यातल्या शिंदे आणि भाजप सरकारने थांबवली पाहिजे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
गणेश विसर्जनाच्या वादानंतर नवनीत राणा पुन्हा रिंगणात, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी सोडली ना
भंडाऱ्या सारखी घटना होता होता राहिली. भंडाऱ्यासह इतर काही ठिकाणीही बालकांच्या वॉर्डमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या. अशा घटना होऊ नये आणि बालकांच्या सुरक्षेसाठी सरकारीकडे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. पण अजूनही सरकारी पातळीवर या बाबत अनास्था आहे. सरकार जागरूक नाहीए. अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना थांबवण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलली पाहिजेत, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे नाना पटोले म्हणाले.
मोठी बातमी : अमरावतीत बालकांच्या ICUमध्ये अचानक लागली आग; तातडीने दुसऱ्या वॉर्डात हलवले
पालकमंत्री स्पायडरमॅन सारखे काम करणार का?
राज्यात कालच जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले. सहा-सहा जिल्ह्याला एक-एक पालकमंत्री दिला गेला आहे. प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीचा आज समन्वय नाही. यामुळे ज्या काही घटना घडतात त्यात शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही. महाराष्ट्रात शासनच नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. लोकशाहीची ही थट्टा राज्यातल्या शिंदे आणि भाजप सरकारने थांबवली पाहिजे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
गणेश विसर्जनाच्या वादानंतर नवनीत राणा पुन्हा रिंगणात, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी सोडली ना