म. टा. प्रतिनिधी, बुलडाणा
संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल या गावाला स्मशानभूमीच नसल्याने नातेवाइकांना पाच किलोमीटर दूर अंतरावर पायपीट करावी लागते. आर्जव, विनंत्या करूनही मागणीपूर्ती झाली नाही. त्यातच शुक्रवारी सकाळी गावातील एका वृद्धेचे निधन झाले. पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला. संतप्त गावकऱ्यांनी पाच तास मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केले. समस्येकडे लक्ष वेधले.
वरवट येथील सरस्वताबाई सत्तू इंगळे (७०) या महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने नातेवाइकांनी स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलन केले. यापूर्वी ७ आणि ९ सप्टेंबर रोजी असाच पेच निर्माण झाला होता. त्यावेळी गावातील कमल गांधी यांनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. मात्र, शुक्रवारी स्मशानभूमीच्या जागेचा पेच कायम असल्याने सरस्वताबाई इंगळे यांच्या नातेवाइकांनी आंदोलन केले. दोन्ही आंदोलनाच्यावेळी प्रशासनाने आठ दिवसांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्यामुळे वरवट येथे स्मशानभूमीची समस्या बिकट बनत असल्याचे दिसून येत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल या गावाला स्मशानभूमीच नसल्याने नातेवाइकांना पाच किलोमीटर दूर अंतरावर पायपीट करावी लागते. आर्जव, विनंत्या करूनही मागणीपूर्ती झाली नाही. त्यातच शुक्रवारी सकाळी गावातील एका वृद्धेचे निधन झाले. पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला. संतप्त गावकऱ्यांनी पाच तास मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केले. समस्येकडे लक्ष वेधले.
वरवट येथील सरस्वताबाई सत्तू इंगळे (७०) या महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने नातेवाइकांनी स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलन केले. यापूर्वी ७ आणि ९ सप्टेंबर रोजी असाच पेच निर्माण झाला होता. त्यावेळी गावातील कमल गांधी यांनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. मात्र, शुक्रवारी स्मशानभूमीच्या जागेचा पेच कायम असल्याने सरस्वताबाई इंगळे यांच्या नातेवाइकांनी आंदोलन केले. दोन्ही आंदोलनाच्यावेळी प्रशासनाने आठ दिवसांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्यामुळे वरवट येथे स्मशानभूमीची समस्या बिकट बनत असल्याचे दिसून येत आहे.