अ‍ॅपशहर

ताडोबातील व्याघ्रवाढीला यंदा लागला ब्रेक

भारतीय वन्यजीव संस्थेद्वारा ताडोब्यात कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे करण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील देखरेखीचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ताडोब्यात व्याघ्रसंख्या स्थिर असल्याचे समोर आले असून ८६ वाघ आढळले आहेत. परिणामी व्याघ्रवाढीला ब्रेक लागल्याच्या बाबीला पुष्टी मिळाली आहे. ताडोब्यात व्याघ्रवाढीसाठी संवर्धन, सुरक्षा हे महत्त्वाचे घटक ठरले होते.

Maharashtra Times 10 May 2017, 5:51 am
चौथ्या टप्प्यातील देखरेखीचा अहवाल जाहीर; वाघांची संख्या ८६वर स्थिर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम population of tigers in tadoba
ताडोबातील व्याघ्रवाढीला यंदा लागला ब्रेक


पंकज मोहरीर, चंद्रपूर

भारतीय वन्यजीव संस्थेद्वारा ताडोब्यात कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे करण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील देखरेखीचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ताडोब्यात व्याघ्रसंख्या स्थिर असल्याचे समोर आले असून ८६ वाघ आढळले आहेत. परिणामी व्याघ्रवाढीला ब्रेक लागल्याच्या बाबीला पुष्टी मिळाली आहे. ताडोब्यात व्याघ्रवाढीसाठी संवर्धन, सुरक्षा हे महत्त्वाचे घटक ठरले होते.

२०१०मध्ये प्रथमच ट्रान्झिक्ट पद्धतीने व्याघ्रगणना देशभर करण्यात आली होती. २०१४मध्येही दुसऱ्यांदा त्याच पद्धतीने भारतीय वन्यजीव संस्थानच्या मदतीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ही मोहीम राबविली. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीच्या या व्याघ्रगणनेला महत्त्व प्राप्त झाले. त्यावेळी राज्यात व्याघ्र वाढ सलग तिसऱ्यांदा दिसून आली. १९० पैकी सह्यांद्री वगळता राज्यात सर्वाधिक १७५ वाघ एकट्या विदर्भात असल्याचे समोर आले. त्यात सर्वाधिक वाघ ताडोब्यात असल्याचे स्पष्ट झाले.
कॅमेरा ट्रॅपिंगच्या चौथ्या टप्प्यातील देखरेखीच्या अहवालानुसार यंदा ताडोब्यात ८६ वाघ दिसून आले आहेत. मागील वर्षी ७१ वाघ कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाले होते. त्याच्या अंदाजित आकडेवारीनुसार ८८ वाघ दिसून आले होते. यंदा ६९ वाघ कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाले आहे. त्यांची अंदाजित संख्या ८६ असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील पाच वर्षांत ताडोब्यातील या व्याघ्रसंख्येत उत्तरोत्तर मोठी वाढ दिसत होती. यंदा मात्र त्यास ब्रेक लागला आहे.

राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लॅन्डस्केपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण क्षेत्र व अन्नसाखळी बघता यापुढे ताडोब्यातील व्याघ्रवाढीला ब्रेक लागू शकतो. तृणभक्षी प्राण्यांची संख्या मुबलक असल्यानेच ताडोब्यात व्याघ्रवाढ दिसून आल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. पण, आता मोठी व्याघ्रवाढ अवघड असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले होते. कारण संख्या वाढल्यास झुंजीच्या घटना वा मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडू शकतील अशी भीती भारतीय वन्ययीव संस्थेचे वरिष्ठ संशोधक डॉ. वाय.व्ही. झाला यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज