ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्यनगरी, अकोला
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य जनसामान्यांच्या वेदनेचा हुंकार आहे. राष्ट्रभक्ती आणि मानवता यांचा समन्वय त्यांच्या साहित्यात आहे. कारण त्यांचे साहित्य जनवेदनेतून आले आहे. साहित्य सुंदर असले पाहिजे, तितकेच ते उपयुक्त असले पाहिजे हे त्यातून स्पष्ट होते. ‘या भारतात बंधुभाव’ हे गीत मला राष्ट्रगीतासारखे वाटते, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलाच्यावतीने चवथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्यनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य हरिभाऊ वेरूळकर, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, स्वागताध्यक्ष डॉ. अभयदादा पाटील, आचार्य डॉ. भास्करराव विघे, डॉ. सुभाष सावरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक परोकार, डॉ. बारोडे, माजी महापौर सुमन गावंडे, सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या सुरुवातीलाच अमरज्योत प्रज्वलित करून शहीद जवानांना हे संमेलन समर्पित करण्यात आले.
संमेलनाचे प्रास्ताविक सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी केले. त्यानंतर भजन सम्राट रामभाऊ गाडगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ग्रामगीता जीवनगौरव पुरस्कार हभप रामधन महाराज, डॉ. भाष्करराव विघे गुरुजी, किसनराव पारिसे, रमेशचंद्र सरोदे आदींना प्रदान करण्यात आला. स्वागताध्यक्ष डॉ. अभयदादा पाटील व खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या भाषणातून ग्रामगीतेचे महत्व विशद केले. संचालन श्रीकृष्ण पखाले तर आभार डॉ. राजीव बोरकर यांनी मानले.
‘पाठ्यपुस्तकांमध्ये ग्रामगीतेचा समावेश व्हावा’
बालपणापासूनच माझ्यावर राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे माझा सदैव प्रयत्न राष्ट्रसंतांच्या विचारांची जोड देत राजकारण करण्याचा असतो. कारण ग्रामगीता समृद्ध भारत करण्याची संजीवनी आहे. समाज घडविण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या साहित्यात आहे. हे साहित्य शालेय अभ्यासक्रमात आले पाहिजे, पाठ्यपुस्तकांमध्ये ग्रामगीतेचा अध्यायाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केली.
ग्रंथदिंडी ठरली लक्षवेधी
चवथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. शनिवारी सकाळी राजकोट मंदिर येथून या ग्रंथदिंडी निघाली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वारे, आचार्य भास्करराव विघे गुरुजी यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले. जय हिंद चौक, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड असा मार्गक्रमण करीत स्वराज्य भवन येथे ग्रंथ दिंडीचा समारोप झाला.
समाजोपयोगी साहित्य वाचा!
चारित्र्यसंपन्न समाज घडविण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार महिलांनी आत्मसात करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच समाजोपयोगी साहित्याचे वाचन महिलांनी करावे, असा सूर ‘चारित्र्यसंपन्न समाज घडविण्यासाठी महिलांची भूमिका’ या विषयावरील परिसंवाद व्यक्त झाला. अध्यक्षस्थानी पौर्णिमा सवई होत्या. वक्त्या म्हणून अॅड. अश्विनी कोहळे, कोमल हरणे यांची उपस्थिती होती.
आज समारोप
आज संमेलनात ‘ग्रामगीतेतील उद्योग चिंतन’वर परिसंवाद, ‘राष्ट्रसंताच्या साहित्यातील राष्ट्रीय एकात्मता’वर परिसंवाद, ‘संत साहित्यातील युवा विचार’वर व्याख्यान, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज-सर्वधर्म समन्वयाची भूमिका’वर परिसंवाद, ‘श्री गुरुदेव सेवा मंडळाची वर्तमानातील गरज’वर परिसंवाद आणि समारोप होईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य जनसामान्यांच्या वेदनेचा हुंकार आहे. राष्ट्रभक्ती आणि मानवता यांचा समन्वय त्यांच्या साहित्यात आहे. कारण त्यांचे साहित्य जनवेदनेतून आले आहे. साहित्य सुंदर असले पाहिजे, तितकेच ते उपयुक्त असले पाहिजे हे त्यातून स्पष्ट होते. ‘या भारतात बंधुभाव’ हे गीत मला राष्ट्रगीतासारखे वाटते, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलाच्यावतीने चवथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्यनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य हरिभाऊ वेरूळकर, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, स्वागताध्यक्ष डॉ. अभयदादा पाटील, आचार्य डॉ. भास्करराव विघे, डॉ. सुभाष सावरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक परोकार, डॉ. बारोडे, माजी महापौर सुमन गावंडे, सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या सुरुवातीलाच अमरज्योत प्रज्वलित करून शहीद जवानांना हे संमेलन समर्पित करण्यात आले.
संमेलनाचे प्रास्ताविक सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी केले. त्यानंतर भजन सम्राट रामभाऊ गाडगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ग्रामगीता जीवनगौरव पुरस्कार हभप रामधन महाराज, डॉ. भाष्करराव विघे गुरुजी, किसनराव पारिसे, रमेशचंद्र सरोदे आदींना प्रदान करण्यात आला. स्वागताध्यक्ष डॉ. अभयदादा पाटील व खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या भाषणातून ग्रामगीतेचे महत्व विशद केले. संचालन श्रीकृष्ण पखाले तर आभार डॉ. राजीव बोरकर यांनी मानले.
‘पाठ्यपुस्तकांमध्ये ग्रामगीतेचा समावेश व्हावा’
बालपणापासूनच माझ्यावर राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे माझा सदैव प्रयत्न राष्ट्रसंतांच्या विचारांची जोड देत राजकारण करण्याचा असतो. कारण ग्रामगीता समृद्ध भारत करण्याची संजीवनी आहे. समाज घडविण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या साहित्यात आहे. हे साहित्य शालेय अभ्यासक्रमात आले पाहिजे, पाठ्यपुस्तकांमध्ये ग्रामगीतेचा अध्यायाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केली.
ग्रंथदिंडी ठरली लक्षवेधी
चवथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. शनिवारी सकाळी राजकोट मंदिर येथून या ग्रंथदिंडी निघाली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वारे, आचार्य भास्करराव विघे गुरुजी यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले. जय हिंद चौक, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड असा मार्गक्रमण करीत स्वराज्य भवन येथे ग्रंथ दिंडीचा समारोप झाला.
समाजोपयोगी साहित्य वाचा!
चारित्र्यसंपन्न समाज घडविण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार महिलांनी आत्मसात करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच समाजोपयोगी साहित्याचे वाचन महिलांनी करावे, असा सूर ‘चारित्र्यसंपन्न समाज घडविण्यासाठी महिलांची भूमिका’ या विषयावरील परिसंवाद व्यक्त झाला. अध्यक्षस्थानी पौर्णिमा सवई होत्या. वक्त्या म्हणून अॅड. अश्विनी कोहळे, कोमल हरणे यांची उपस्थिती होती.
आज समारोप
आज संमेलनात ‘ग्रामगीतेतील उद्योग चिंतन’वर परिसंवाद, ‘राष्ट्रसंताच्या साहित्यातील राष्ट्रीय एकात्मता’वर परिसंवाद, ‘संत साहित्यातील युवा विचार’वर व्याख्यान, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज-सर्वधर्म समन्वयाची भूमिका’वर परिसंवाद, ‘श्री गुरुदेव सेवा मंडळाची वर्तमानातील गरज’वर परिसंवाद आणि समारोप होईल.