अमरावती : गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर केला होता. त्यांच्या याच वक्तव्याप्रकरणी काल बच्चू कडू यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. बच्चू कडू यांच्या तक्रारीवर प्रतिक्रिया विचारली असता, माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही. मी धडा शिकवणारच.. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी सर्वश्री असेल, असं सांगायला देखील रवी राणा विसरले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) '५० खोके, एकदम ओक्के'ची घोषणा देत बंडखोर आमदारांना जेरीस आणले होते. पावसाळी अधिवेशनात या घोषणेवरून रणकंदन झाले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) इतर नेत्यांकडून अधुनमधून खोक्यांचा उल्लेख होत असला तरी '५० खोके, एकदम ओक्के' या वाक्याचा अनेकांना विसर पडला होता. परंतु, आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादामुळे खोक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
तर मी त्यांना धडा शिकवेन- रवी राणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी सर्वश्री आहे. त्यांचा जो आदेश राहील त्या आदेशाचं मी पालन करेल. पण जो स्वत:ला खूप हुशार समजत असेल, माझ्यावर खालच्या भाषेत टीका करत असेल तर मी त्याला सोडणार नाही, स्वतःला सत्यवादी समजणाऱ्यांना लोक धडा शिकवतील, असं रवी राणा म्हणाले.
मी जर खोके घेतले असतील तर शिंदे-फडणवीसांनी जाहीर करावे
बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आशयाचे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. या वक्तव्यावर बच्चू कडू (Bacchu Kadu) चांगलेच संतापले होते. रवी राणांच्या (Ravi Rana) टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्ये खेचले. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले.
तर सरकारची डोकेदुखी वाढणार
यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या बंड हे पैसे आणि सत्तेच्या हव्यासापायी झाले होते, असा संदेश सामान्य जनतेमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे बच्चू कडू यांच्याप्रमाणे शिंदे गटातील आमदारही रवी राणांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तसे झाल्यास शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
तर मी त्यांना धडा शिकवेन- रवी राणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी सर्वश्री आहे. त्यांचा जो आदेश राहील त्या आदेशाचं मी पालन करेल. पण जो स्वत:ला खूप हुशार समजत असेल, माझ्यावर खालच्या भाषेत टीका करत असेल तर मी त्याला सोडणार नाही, स्वतःला सत्यवादी समजणाऱ्यांना लोक धडा शिकवतील, असं रवी राणा म्हणाले.
मी जर खोके घेतले असतील तर शिंदे-फडणवीसांनी जाहीर करावे
बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आशयाचे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. या वक्तव्यावर बच्चू कडू (Bacchu Kadu) चांगलेच संतापले होते. रवी राणांच्या (Ravi Rana) टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्ये खेचले. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले.
तर सरकारची डोकेदुखी वाढणार
यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या बंड हे पैसे आणि सत्तेच्या हव्यासापायी झाले होते, असा संदेश सामान्य जनतेमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे बच्चू कडू यांच्याप्रमाणे शिंदे गटातील आमदारही रवी राणांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तसे झाल्यास शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.