अ‍ॅपशहर

आता टॉयलेटही इको​फ्रेंडली! शेतकरी मित्रांनी तयार केलं ग्रीन बायोटॉयलेट, शेतीसाठीही फायद्याचं...

देशातील पहिलाच असा प्रकल्प असल्याचा दावा या संशोधकांनी केला असून या दोन्ही संशोधकांचा सन्मान संगनक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी अमरावती येथे त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात केला.

Maharashtra Times 13 Oct 2021, 3:35 pm
अमरावती : दिवसेंदिवस शहरापासून ते ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सेफ्टी शौचालयाची निर्मिती होत आहे. या शौचालयतून बाहेर येणाऱ्या पाण्यामुळे डेंगू, मलेरिया, हिवतापसह आदी आजारांचे व डासांचे, दुर्गंधीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून रवींद्र गणोरकर आणि संजय जोशी दोन संशोधक मित्रांनी पाच दहा नव्हे तर तब्बल तीस वर्षे संशोधन करून इकोफ्रेंडली ग्रीन टॉयलेटची निर्मिती केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amravati news 1


देशातील पहिलाच असा प्रकल्प असल्याचा दावा या संशोधकांनी केला असून या दोन्ही संशोधकांचा सन्मान संगनक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी अमरावती येथे त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात केला. प्रकल्पाचे कौतूक करत या संशोधकानी निर्मिती केलेले इकोफ्रेंडली ग्रीन बायोटॉयलेट हे देशासाठी काळाची गरज असल्याचं मत संगणक शास्त्रज्ञ डॉ विजय भटकर यांनी व्यक्त केलं.

ही तर शेतकऱ्यांची थट्टा! आधीच कर्जात असतना विमा कंपन्या खात्यात पाठवतात फक्त...
यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आभासी पध्दतीने तर देवनाथ मठाचे पिठाधिश श्री जितेंद्रनाथ महाराज सह आदी मान्यवर देखील उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रवींद्र गणोरकर व संजय जोशी यांना तीस वर्षांपूर्वी इकोफ्रेंडली ग्रीन बायोटॉयलेट निर्मितीची संकल्पना सुचलीय त्यासाठी त्यांनी तबल तीस वर्ष परिश्रम घेतले.

कमी जागेत, कमीत कमी खर्चात, कमी पाण्यात या बायोटॉयलेटचा उपयोग करता येतो.या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा बायोटॉयलेट सहज नेता येतो. तसेच शेतीसाठी या शौचालयाच्या पाण्याचा वापर करता येतो जनेकरून शेती सुपीक होईन. ग्रामीण भागातील या संशोधकानी तयार केलेल्या या प्रोजेक्टला देशातील शासनाच्या नामांकीत संशोधक संस्थांनी परवानगी देऊन प्रमाणपत्र दिले आहेत.

इकोफ्रेंडली ग्रीन बायोटॉयलेटची निर्मिती हे प्रदूषण व रोगराई मुक्त भारत करण्याच्या संकल्पनेतून झाली असल्याचं या संशोधकांनी सांगितलं.घरोघरी अशा प्रकारचे टॉयलेट लावल्यास लोकांचा खर्च वाचू शकतो तसेच विविध रोगांना आळा घालता येऊ शकतो अस या संशोधकानी संगीतल.तसेच घरी सेफ्टी शौचालयाची निर्मिती करायची झाल्यास मोठा खड्डा खोदावा लागतो परन्तु या टॉयलेट साठी मोठा खड्डा ही खोदावा लागत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज