अ‍ॅपशहर

राजस्थानातून 'ते' अमरावतीला निघालेत, सतर्क राहा! खासदार नवनीत राणांना निनावी पत्र

amravati mp navneet rana gets letter: खासदार नवनीत राणा यांना एक निनावी पत्र आलं आहे. राजस्थान सीमेवरून काहीजण अमरावतीला येत आहेत. सतर्क राहा, असा मजकूर पत्रात आहे. राणा यांच्या अमरावतीमधील घरात हे निनावी पत्र आलं आहे. या पत्रामुळे राणा यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jul 2022, 1:05 pm
अमरावती: खासदार नवनीत राणा यांना एक निनावी पत्र आलं आहे. राजस्थान सीमेवरून काहीजण अमरावतीला येत आहेत. सतर्क राहा, असा मजकूर पत्रात आहे. राणा यांच्या अमरावतीमधील घरात हे निनावी पत्र आलं आहे. या पत्रामुळे राणा यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rana 1
खासदार नवनीत राणा


राजस्थान सीमेवरून काहीजण अमरावतीकडे येत आहेत. तुम्ही सतर्क राहा. तुम्हाला काही होऊ नये यासाठी अल्लाहकडे दुआ करतो, असा उल्लेख निनावी पत्रात आहे. राजस्थान आणि अमरावतीमध्ये गेल्या महिन्यात एकसारख्याच घटना घडल्या. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचं समर्थ केल्यानं राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या टेलरची हत्या करण्यात आली. तर अमरावतीमध्ये केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली.
उंदिर मारण्यासाठी विषारी टोमॅटो ठेवला; पण टीव्हीच्या नादानं घात केला, मुंबईत महिलेचा मृत्यू
कन्हैया लाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येमध्ये समान धागे आहेत. दोघांनी नुपूर शर्माचं समर्थन केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. गळा चिरुन त्यांना संपवण्यात आलं. कोल्हे यांची हत्या आधी झाली. सुरुवातीला हे प्रकरण दरोड्याचं वाटत होतं. मात्र नवनीत राणा यांनी हे प्रकरण उदयपूर सारखंच असल्याचा दावा केला. त्यांनी हे प्रकरण बरेच दिवस लावून धरलं.
शिंदेंची 'ती' दिल्लीवारी रद्द झालीच नव्हती; शाहांसोबतच्या 'गुप्त'भेटीत काय काय ठरलं?
पोलिसांनी आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कोल्हे यांच्या हत्येचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप राणा यांनी केला होता. राणा यांनी कोल्हे यांच्या कुटुंबांची भेटदेखील घेतली होती. राणा यांनी कोल्हे यांच्या हत्येचं प्रकरण लावून धरलं होतं. ते प्रकरण राजस्थानच्या उदयपूरमधील घटनेशी बरंच मिळतंजुळतं होतं. यानंतर आता राणांना एक निनावी पत्र आलं आहे. त्यात राजस्थानचा उल्लेख आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

महत्वाचे लेख