अ‍ॅपशहर

तळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेला सुट्टी असल्याने उद्यानात गेलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा वनतळ्यात बुडून मृत्यू झाला. मोर्शी येथील वनपर्यटन उद्यानात सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Maharashtra Times 23 Aug 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student dead in amrawati district
तळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू


शाळेला सुट्टी असल्याने उद्यानात गेलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा वनतळ्यात बुडून मृत्यू झाला. मोर्शी येथील वनपर्यटन उद्यानात सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ओम सुधाकर बोडखे (१२) असे तळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या श्रावण सोमवार असल्याने नगरपरिषदेच्या शाळांना दुपारनंतर सुटी दिली जाते. यामुळे मोर्शी येथील नगरपरिषदेच्या कासारपुरा शाळा (क्र.२) येथील ओम बोडखे व त्याचा मित्र सौरभ छत्रपती बरडे (११), दोघेही रा. भवानी चौक, माळीपुरा हे शहराच्या दुसऱ्या टोकावरील वनविभागाच्या वनपर्यटन उद्यानात गेले. परंतु सोमवार असल्याने उद्यान बंद होते. त्यामुळे ओम व सौरभ यांनी उद्यानाच्या मागील बाजूने असणाऱ्या तारेच्या कुंपणावरून उडी मारून उद्यानात प्रवेश केला. उद्यानात काही शेततळे तयार करण्यात आले आहे. सध्या पावसामुळे शेततळे तुडूंब भरली असून तलावाच्या तळाशी चिखल आहे. ओम व सौरभ यांनी कपडे काढून पोहण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली. परंतु ओम तळ्यातील गाळात अडकल्याने तो बुडाला तर सौरभ याने गाळातून स्वत:ची सुटका करून तो पाण्याच्या वर आला. ओम तळ्यातील गाळात फसल्याने त्याचा मृत्यू झाला. यामुळे सौरभने आरडाओरड सुरू केली. उद्यानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यातील एकाने तळ्यात उडी घेऊन ओमला बाहेर काढले. पण, यापूर्वीच ओमचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ओमचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तान्हुल्यासह मातेची विहिरीत उडी

यवतमाळ : रक्षाबंधनाला माहेरी जाऊ न दिल्याने संतप्त झालेल्या महिलेने आपल्या आठ महिन्याच्या तान्हुल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तान्हुल्याचा मृत्यू झाला असून महिलेला वाचविण्यात यश आले आहे.

पारवापासून चार किमी अंतरावरील वरुडभक्त येथे ही घटना घडली. राजश्री प्रशांत राऊत यांना भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जायचे होते. काही अडचणीमुळे माहेरून तिला घेण्यासाठी भाऊ आला नाही. पतीनेही तिला माहेरी सोडून दिले नाही. त्यामुळे चार दिवसांपासून राजश्री संतप्त होती. यातूनच तिने मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. पारवा पोलिसांनी गुन्हे दाखल करून राजश्रीला अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज