यवतमाळ : विद्यार्थ्यांना वाईट सवयींपासून परावृत्त करण्याचे काम शिक्षकांचे आहे. पण, अनेक शिक्षकच तंबाखू खात असल्याने अडचण होते. यवतमाळ जिल्ह्यात यापुढे तंबाखू खाणाऱ्या शिक्षकांना त्यांचेच विद्यार्थी चांगलाच धडा शिकविणार आहेत. शिक्षक तंबाखू खात असल्याचे विद्यार्थ्यांनी कळविल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. त्यामुळे तंबाखू खाणाऱ्या शिक्षकांमध्ये धडकी भरली आहे.
तंबाखू, खर्रा, धूम्रपान या व्यसनापासून नवीन पिढीला दूर ठेवण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदने स्वातंत्र्यदिनी ‘तंबाखूमुक्त शाळा’ या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. अर्जुना येथे जिल्हा परिषद शाळेत यासंबंधीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना, गवळी प्राथमिक शिक्षण अधिकारी सुचेता पाटेकर, अर्जुनाचे सरपंच मुकुंद व्यवहारे हजर होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे असल्याचे सांगितले. गावातील १५ अवैध दारूविक्रेत्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना देताच त्यांच्यावर रात्री १२ वाजतापूर्वी प्रतिबंधक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले.
तंबाखू, खर्रा, धूम्रपान या व्यसनापासून नवीन पिढीला दूर ठेवण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदने स्वातंत्र्यदिनी ‘तंबाखूमुक्त शाळा’ या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. अर्जुना येथे जिल्हा परिषद शाळेत यासंबंधीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना, गवळी प्राथमिक शिक्षण अधिकारी सुचेता पाटेकर, अर्जुनाचे सरपंच मुकुंद व्यवहारे हजर होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे असल्याचे सांगितले. गावातील १५ अवैध दारूविक्रेत्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना देताच त्यांच्यावर रात्री १२ वाजतापूर्वी प्रतिबंधक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले.