अ‍ॅपशहर

अचलपूर, परतवाड्यात अतिरेकी संघटना सक्रिय!, सत्यशोधन समितीचा धक्कादायक दावा

नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेतर्फे ही सत्यशोधन समिती तयार करण्यात आली होती. या समितीने अचलपूर येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भेटी घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करून एक अहवाल तयार केला. या अहवालातून धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2022, 9:31 am
अमरावती : जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर परतवाडा शहरात बंदी घातलेल्या अतिरेकी संघटना सक्रिय असल्याचे धक्कादायक निरीक्षण सत्यशोधन समितीने नोंदवल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terroris organisation active in achalpur and paratwada claims satyashodhan samiti
अचलपूर, परतवाड्यात अतिरेकी संघटना कार्यरत!, सत्यशोधन समितीचे धक्कादायक निरीक्षण


अचलपूर हा राज्यमंत्री बच्चू कडू यांचा मतदारसंघ आहे. अचलपूर येथे एप्रिल महिन्यात शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेची पार्श्वभूमी तपासण्यासाठी सत्यशोधन समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केला आहे. या अहवालात समितीने हे निरीक्षण नोंदवले आहे. अचलपूर शहरात उसळलेली दंगल गुप्तचर विभागाचे पूर्ण अपयश असल्याचे निरीक्षणही समितीने नोंदविले आहे. समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी पत्रकार परिषदेत समितीच्या अहवालाबाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेला समितील सदस्य मीरा खडक्कार, मैत्री परिवाराचे संजय भेंडे उपस्थित होते.

अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर झेंडा फडकावल्याच्या वादातून १७ एप्रिलच्या रात्री दोन समुदायात वाद होऊन दंगल उसळली. या घटनेची सत्यता शोधण्यासाठी नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेतर्फे ६ सदस्यीय सत्यशोधन समिती तयार करण्यात आली होती. समितीने २ ते ४ मे या तीन दिवसांत १०० पेक्षा जास्त लोकांच्या भेटी घेतल्या. यात सामान्य नागरिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि पत्रकारांशी समितीने चर्चा केली.

'राणा दाम्पत्य भाजपचे झोमॅटो डिलिव्हरी कपल'; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

पोलिसांचे असहकार्य

प्रशासनाकडून समिती सदस्यांच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्यात आले. विशिष्ट समुदायासोबत चर्चा होणार नाही, याची खात्री करण्यात आली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी विनंती करूनही समितीला माहिती देणे टाळले. समिती सदस्यांसोबत अगदी गोड बोलून अक्षरश: त्यांना हकलून दिल्याचा आरोप डॉ. निरगुडकर यांनी केला.

निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् दुसऱ्यांची चाकरी करायची, यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज