अ‍ॅपशहर

मासे पकडण्यासाठी टाळलेल्या जाळ्यात स्वत:च अडकले; तीन मच्छिमारांचा करुण अंत

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तीन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मच्छिमार जाळे काढण्यासाठी गेले असताना त्यांचा मृत्यू झाला.

Edited byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2022, 2:22 pm
अमरावती: जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तीन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मच्छिमार जाळे काढण्यासाठी गेले असताना त्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amaravati fisherman drown


तीन मच्छिमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तीनही मच्छिमार तिवसा तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळतात तहसीलदार वैभव फरतारे घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले असून मच्छिमारांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे.
सुनेला कुत्र्याची ऍलजी, पण सासू-सासरे ऐकेनात; नाराजीतून लेकीसह टोकाचं पाऊल उचललं
स्थानिक शेतकरी सकाळी १० च्या सुमारास शेतावर गेला होता. त्यावेळी हा प्रकार त्याच्या लक्षात आला. तीन मच्छिमारांनी जाळे नदीतून बाहेरुन काढण्यासाठी उड्या घेतल्या. ते पोहत पोहत कोपऱ्यात गेले आणि बुडू लागले. शेतकऱ्याने ही बाब शेजारच्या शेतात काम करणाऱ्यांना सांगितली. त्यानंतर त्याने हा प्रकार मुलाच्या कानावर घातला. मुलाने नगर पंचायतीशी संपर्क साधला. यानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र अद्याप तरी एकही मृतदेह हाती लागलेला नाही.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख