म. टा. प्रतिनिधी, बुलडाणा/अकोला
विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच सोमवारी सातपुड्याच्या पायथ्याशी दमदार पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांना पूर आले.जळगाव जामोद-संग्रामपूर, अकोट-हिवरखेड मार्ग बंद झाला होता. या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ७१२ मिमी पावसाची नोंद केली जाते. १ जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यानचा हा कालावधी आहे. मात्र, यंदा सोमवारपर्यंत केवळ १३.३० मिमी पाऊस झाल्याने चिंतेचे ढग पसरले आहेत. संग्रामपूरपासून पुढे असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवत दुपारी ३ ते ५ या कालावधीत दमदार हजेरी लावली. पर्वतरांगामधून पाणी वाहिल्याने नद्या तुंडूब वाहू लागल्या. संग्रामपूरवरून तेल्हाराकडे जाणारा मार्ग आणि संग्रामपूरकडे जळगाव जामोद मार्गे येणारे रस्ते पुरामुळे बंद झाले होते. खेर्डा आणि निवाणा नदी तसेच हनुमान सागरकडे जाणाऱ्या वान नदीला पूर आल्याने वाहतूक बंद होती. शेगाव मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. वरवट बकाल परिसरातील लेंडी नदीलाही पूर आला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
युवक बेपत्ता जामोद नदीला आलेल्या पुरात वसंता बोबडे हा युवक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या शोधासाठी गावकरी प्रयत्न करीत आहेत. शिवाय टुनकी खुर्द येथील शाळेजवळ ४.३० वाजताच्या दरम्यान वीज कोसळली. आज शाळेचा पहिलाच दिवस होता. मात्र कुठलीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
आपत्ती विभाग अनभिज्ञ
जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती विभागाची रचना करण्यात आली आहे. पाऊस, पूर, वीजबळी अथवा अन्य नैसर्गिक संकटांमध्ये प्राथमिक माहिती गोळा करून परिस्थितीवर नियंत्रणासाठी दिशादर्शक सूचना देण्याचे काम या विभागाकडे आहे. मात्र, २४ तास चालणाऱ्या कक्षात इतर विभागाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाते. यातील काहीच माहिती नाही, असे उत्तरांचे सोपस्कार या ठिकाणावरून पार पाडले जातात. घटनेसंदर्भात अनभिज्ञ असलेल्या या विभागाचे नेमक काम काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वर्धा जिल्ह्यात वीज कोसळून तिघे ठार
वर्धा : जिल्ह्यात वीज कोसळून सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला. आर्वी तालुक्यातील लाहदेवी शिवारात मेश्राम यांच्या शेतात काम करीत असताना सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून जयश्री धुर्वे (१७) आणि अनिकेत परतेकी (११) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह असलेले तिघे जखमी असून आर्वी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबरोबरच सेलू तालुक्यातील महाबळा येथे शीला सुरेश पारधी यांचाही वीज कोसळून मृत्यू झाला. तर पती आणि मुलगा जखमी झाला आहे.
अन् सहस्त्रकुंड वाहू लागला... गेल्या तीन वर्षात पाऊस कमी झाल्याने जून महिन्यात सहस्त्रकुंड धबधबा हा कोरडाच राहात होता. पण, यंदा सहस्त्रकुंडच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने खळाळून वाहू लागला आहे. विदर्भ -मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवर नैसर्गिकरित्या हा धबधबा तयार झाला आहे. विदर्भ-मराठवाड्यातील पर्यटकांसाठी हा धबधबा विशेष आकर्षण आहे. रविवारी येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच सोमवारी सातपुड्याच्या पायथ्याशी दमदार पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांना पूर आले.जळगाव जामोद-संग्रामपूर, अकोट-हिवरखेड मार्ग बंद झाला होता. या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ७१२ मिमी पावसाची नोंद केली जाते. १ जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यानचा हा कालावधी आहे. मात्र, यंदा सोमवारपर्यंत केवळ १३.३० मिमी पाऊस झाल्याने चिंतेचे ढग पसरले आहेत. संग्रामपूरपासून पुढे असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवत दुपारी ३ ते ५ या कालावधीत दमदार हजेरी लावली. पर्वतरांगामधून पाणी वाहिल्याने नद्या तुंडूब वाहू लागल्या. संग्रामपूरवरून तेल्हाराकडे जाणारा मार्ग आणि संग्रामपूरकडे जळगाव जामोद मार्गे येणारे रस्ते पुरामुळे बंद झाले होते. खेर्डा आणि निवाणा नदी तसेच हनुमान सागरकडे जाणाऱ्या वान नदीला पूर आल्याने वाहतूक बंद होती. शेगाव मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. वरवट बकाल परिसरातील लेंडी नदीलाही पूर आला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
युवक बेपत्ता जामोद नदीला आलेल्या पुरात वसंता बोबडे हा युवक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या शोधासाठी गावकरी प्रयत्न करीत आहेत. शिवाय टुनकी खुर्द येथील शाळेजवळ ४.३० वाजताच्या दरम्यान वीज कोसळली. आज शाळेचा पहिलाच दिवस होता. मात्र कुठलीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
आपत्ती विभाग अनभिज्ञ
जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती विभागाची रचना करण्यात आली आहे. पाऊस, पूर, वीजबळी अथवा अन्य नैसर्गिक संकटांमध्ये प्राथमिक माहिती गोळा करून परिस्थितीवर नियंत्रणासाठी दिशादर्शक सूचना देण्याचे काम या विभागाकडे आहे. मात्र, २४ तास चालणाऱ्या कक्षात इतर विभागाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाते. यातील काहीच माहिती नाही, असे उत्तरांचे सोपस्कार या ठिकाणावरून पार पाडले जातात. घटनेसंदर्भात अनभिज्ञ असलेल्या या विभागाचे नेमक काम काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वर्धा जिल्ह्यात वीज कोसळून तिघे ठार
वर्धा : जिल्ह्यात वीज कोसळून सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला. आर्वी तालुक्यातील लाहदेवी शिवारात मेश्राम यांच्या शेतात काम करीत असताना सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून जयश्री धुर्वे (१७) आणि अनिकेत परतेकी (११) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह असलेले तिघे जखमी असून आर्वी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबरोबरच सेलू तालुक्यातील महाबळा येथे शीला सुरेश पारधी यांचाही वीज कोसळून मृत्यू झाला. तर पती आणि मुलगा जखमी झाला आहे.
अन् सहस्त्रकुंड वाहू लागला... गेल्या तीन वर्षात पाऊस कमी झाल्याने जून महिन्यात सहस्त्रकुंड धबधबा हा कोरडाच राहात होता. पण, यंदा सहस्त्रकुंडच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने खळाळून वाहू लागला आहे. विदर्भ -मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवर नैसर्गिकरित्या हा धबधबा तयार झाला आहे. विदर्भ-मराठवाड्यातील पर्यटकांसाठी हा धबधबा विशेष आकर्षण आहे. रविवारी येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.