म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष राज्यात कमी आहे. अनेक वेळा निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतावणारी ही समस्या दूर व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प निश्चित मुदतीतच पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
या सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी एक हजार ४८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ बाभुळगाव तालुक्यातील घारफळ येथे रविवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री मदन येरावार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार भावना गवळी, आमदार अशोक उईके, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबवायच्या असतील तर वीज, पाणी व मालाला योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहे. गेल्या तीन वर्षात २० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळावी, यासाठी राज्य सरकारने सौर फिडर योजना तयार केली आहे. या योजनेला नीती आयोगाने मान्यता दिली आहे. नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असून शासनाच्या तिजोरीवरील भारही कमी होणार आहे. सध्या राज्य सरकारला ६ रूपये प्रति युनिट प्रमाणे वीजेसाठी पैसे द्यावे लागतात. सौर उर्जेमुळे हा दर ३ रु २० पैशांपर्यंत कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
एक वर्षांत करा काम ः गडकरी
बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील एक मध्यम व १५ लघु प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे एक वर्षाच्या आत पूर्ण व्हायला हवीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पासाठी ३६०० कोटी रु चा निधी मंजूर केला असून यापैकी २ हजार कोटी खर्च झाले आहेत. या प्रकल्पामुळे दोन लाख हेक्टरवर सिंचनाची सोय होणार आहे, असे गडकरी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले.
‘बायो-इथेनॉलचा वापर वाढावा’
पेट्रोल, डिझेलला ईथेनॉल हा स्वस्त पर्याय आहे. आज अनेक ठिकाणी ईथेनॉलवरील बसेस सुरू झाल्या आहेत. शेतातील पऱ्हाटी, तुराटी, तण याचा उपयोग करून सीएनजी व बायो-इथेनॉल तयार केले जाऊ शकते. या इंधनावर चालणाऱ्या बाइक्स बाजारात येऊ घातल्या आहेत. या गाड्या पेट्रोल आणि इथेनॉल दोन्हीवर चालू शकतात, असे ते म्हणाले. याबाबत मी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना समजावून सांगितले. परंतु, त्यांना ते फारसे लक्षात आले नाही, असे गडकरी म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष राज्यात कमी आहे. अनेक वेळा निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतावणारी ही समस्या दूर व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प निश्चित मुदतीतच पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
या सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी एक हजार ४८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ बाभुळगाव तालुक्यातील घारफळ येथे रविवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री मदन येरावार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार भावना गवळी, आमदार अशोक उईके, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबवायच्या असतील तर वीज, पाणी व मालाला योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहे. गेल्या तीन वर्षात २० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळावी, यासाठी राज्य सरकारने सौर फिडर योजना तयार केली आहे. या योजनेला नीती आयोगाने मान्यता दिली आहे. नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असून शासनाच्या तिजोरीवरील भारही कमी होणार आहे. सध्या राज्य सरकारला ६ रूपये प्रति युनिट प्रमाणे वीजेसाठी पैसे द्यावे लागतात. सौर उर्जेमुळे हा दर ३ रु २० पैशांपर्यंत कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
एक वर्षांत करा काम ः गडकरी
बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील एक मध्यम व १५ लघु प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे एक वर्षाच्या आत पूर्ण व्हायला हवीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पासाठी ३६०० कोटी रु चा निधी मंजूर केला असून यापैकी २ हजार कोटी खर्च झाले आहेत. या प्रकल्पामुळे दोन लाख हेक्टरवर सिंचनाची सोय होणार आहे, असे गडकरी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले.
‘बायो-इथेनॉलचा वापर वाढावा’
पेट्रोल, डिझेलला ईथेनॉल हा स्वस्त पर्याय आहे. आज अनेक ठिकाणी ईथेनॉलवरील बसेस सुरू झाल्या आहेत. शेतातील पऱ्हाटी, तुराटी, तण याचा उपयोग करून सीएनजी व बायो-इथेनॉल तयार केले जाऊ शकते. या इंधनावर चालणाऱ्या बाइक्स बाजारात येऊ घातल्या आहेत. या गाड्या पेट्रोल आणि इथेनॉल दोन्हीवर चालू शकतात, असे ते म्हणाले. याबाबत मी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना समजावून सांगितले. परंतु, त्यांना ते फारसे लक्षात आले नाही, असे गडकरी म्हणाले.