अ‍ॅपशहर

‘व्यवस्थेलाच आत्महत्या करायला लावू’

यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. ज्या व्यवस्थेने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणली, त्याच व्यवस्थेला आत्महत्या करण्यास भाग पाडू, असा इशारा नाना पटोले यांनी गुरुवारी दिला. काँग्रेस पक्षात प्रवेश कल्यानंतर माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना पटोले यांनी यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला.

Maharashtra Times 12 Jan 2018, 4:30 am
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yavatmal nana patloe to start agitation for farmers
‘व्यवस्थेलाच आत्महत्या करायला लावू’


यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. ज्या व्यवस्थेने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणली, त्याच व्यवस्थेला आत्महत्या करण्यास भाग पाडू, असा इशारा नाना पटोले यांनी गुरुवारी दिला. काँग्रेस पक्षात प्रवेश कल्यानंतर माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना पटोले यांनी यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला.

पटोले म्हणाले, या देशात सर्वांना सांभाळून काँग्रेस पक्षच राज्य करू शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे काँग्रेसच्या काळातही काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा घेत भाजप सत्तेवर आला. पण आता शेतकऱ्यांनाच त्याचा पश्चात्ताप होत आहे. शेतमालाला भाव नाही, बोंडअळीने शेतकरी उद्‍ध्वस्त झाला आहे. राज्य सरकारची कर्जमाफी योजनाही फसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या. शेतकऱ्यांबाबत हे सरकार संवेदनाहीन झाले आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

एफडीआयला परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुन्हा एकदा पारतंत्र्याकडे लोटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे भाजपचे सरकार लवकरात लवकर गेले पाहिजे.

कोरेगाव भीमाची घटना हे शासनाचे अपयश आहे. समाजातील ९८ टक्के लोकांमध्ये भांडणे लावायची आणि दोन टक्के लोकांनी राज्य करायचे, हा भाजपचा डाव आहे असे ते म्हणाले.

यावेळी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, माजी आमदार विजया धोटे, मिलिंद धुर्वे उपस्थित होते.


घरी परतल्याचा आनंद
पुन्हा काँग्रेसवासी झाल्यामुळे मला पुन्हा घरी परतल्याचा आनंद झाला आहे. आता पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काँग्रेसमध्ये काही प्रमाणात गटबाजी असली तरी पक्ष मोठा आहे. एका रात्रीत सर्व एकत्र येतात, असे ते म्हणाले. मी केंद्रात जावे की राज्यात याचा निर्णय पक्षाचे नेते घेतील. माझ्या दृष्टीने प्रफुल्ल पटेल हा महत्त्वाचा प्रश्न नाही. पुढे राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी झाली तर जागा वाटपात बदलही होऊ शकतो, असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज