अ‍ॅपशहर

यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा

वर्धा, चंद्रपूरप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातही शासनाने दारूबंदी करावी, या मागणीसाठी ‘स्वामीनी जिल्हा दारूबंदी अभियान’ने पुन्हा नव्या जोमाने जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. ‘दारूबंदी झालीच पाहिजे’, असे नारे देत राळेगांव येथे गुरुवारी स्वामींनीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. स्वामिनीचे तालुका संयोजक बालाजी कदम यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात जिल्हा संयोजक महेश पवार, विनोद देवतळे, कळंब तालुका संयोजक मनीषा काटे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Maharashtra Times 10 Mar 2017, 4:00 am
म.टा. वृत्तसेवा, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yeotmal deman of wine band in district
यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा


वर्धा, चंद्रपूरप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातही शासनाने दारूबंदी करावी, या मागणीसाठी ‘स्वामीनी जिल्हा दारूबंदी अभियान’ने पुन्हा नव्या जोमाने जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. ‘दारूबंदी झालीच पाहिजे’, असे नारे देत राळेगांव येथे गुरुवारी स्वामींनीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. स्वामिनीचे तालुका संयोजक बालाजी कदम यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात जिल्हा संयोजक महेश पवार, विनोद देवतळे, कळंब तालुका संयोजक मनीषा काटे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राळेगांव येथील क्रांती चौकातून गुरुवारी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने नगरपंचायतचे अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यापुढे कोणत्याही दारू दुकानदारांना नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी यावेळी महिलांनी केली. यावेळी स्वामिनीचे जिल्हा संयोजक महेश पवार यांनी आपल्या भाषणात शासनावर जोरदार टीका केली. ‘राज्यात दारूबंदी करण्याची भाजप सरकारची इच्छाच नाही. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ग्रामीण भाग दारूच्या विळख्यात सापडला आहे. अशावेळी दारूबंदी हाच एकमेव उपाय आहे’, असे ते म्हणाले. जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने बुधवारी झरी येथे स्वामिनीच्यावतीने, यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

३२ लाखांची दारू पकडली

होळीसाठी चंद्रपूर जिल्ह्याकडे नाशिकवरून दारू घेऊन निघालेला ट्रक यवतमाळ पोलिसांनी शहराच्या बायपासवरच पकडला. या कारवाईमुळे अवैध मार्गाने दारूचा पुरवठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या ट्रकमधील अंदाजे ३२ लाख रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या ७३१ बाटल्या व अंदाजे १३ लाख रुपये किमतीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. या ट्रकच्या चालकालाही पोलिसांनी अटक केली आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी पोल‌िस कारवाई असल्याचे टोळीविरोधी पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक प्रशांत गीते यांनी सांगितले. चंद्रपूरकडे मोठ्या प्रमाणात दारू जात असल्याची माहिती मिळाल्यावर टोळीविरोधी पथकाने सर्वत्र नाकाबंदी केली. मध्यरात्री एक ट्रक घाटंजी मार्गाने चंद्रपूरकडे जात असताना पोलिसांनी बायपासवरच हा ट्रक अडविला. होळीसाठी मोठ्या प्रमाणात वर्धा, चंद्रपूर या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात यवतमाळमार्गे दारूचा साठा जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सर्वत्र कडक बंदोबस्त लावला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज