अ‍ॅपशहर

जिल्ह्यातील कर्जमाफीचे १०२ कोटी बँकेत जमा

शेतकरी कर्जमाफी आणि इन्सेंटिव्हसाठी जिल्ह्यातून तब्बल दोन लाख सहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळोवेळी आलेल्या सूचनांची पूर्तता करत अखेरीस औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १०२ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यात २३ हजार कर्जमाफीचे, तर ५४ हजार इन्सेंटिव्हचे लाभार्थी आहेत.

Maharashtra Times 11 Dec 2017, 11:00 am
औरंगाबाद : शेतकरी कर्जमाफी आणि इन्सेंटिव्हसाठी जिल्ह्यातून तब्बल दोन लाख सहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळोवेळी आलेल्या सूचनांची पूर्तता करत अखेरीस औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १०२ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यात २३ हजार कर्जमाफीचे, तर ५४ हजार इन्सेंटिव्हचे लाभार्थी आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 102 crore deposited in bank for debt relief
जिल्ह्यातील कर्जमाफीचे १०२ कोटी बँकेत जमा


सततचा दुष्काळ आणि कर्जाचे ओझे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्य सरकारकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली जात होती. विरोधी पक्षांनी राज्यभर जनजागृती यात्राही काढली होती. राज्य सरकारने अखेरीस नियम व अटींच्या अधीन राहून विशिष्ट मर्यादेपर्यंत शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. त्यातही सर्व अर्ज ऑनलाइन भरण्याची सक्ती केली गेली होती. राज्यभरातील यंत्रणा यानिमित्ताने कामाला लागली होती. मुदतीपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची मुंबईत एका यंत्रणेद्वारे छाननी करण्यात आली. त्यानंतर निकषपात्र अर्जांचा विचार कर्जमाफीसाठी केला गेला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातून कर्जमाफी आणि इन्सेंटिव्हसाठी दोन लाख सहा हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यातील अनेक अर्जांत त्रुटी आढळून आल्या. त्याची पूर्तता करून देण्यासाठी जिल्हा बँकेकडे सूचना पाठविली गेली. बँकेचे दैनंदिन कामकाज सांभाळत प्रशासनाला त्रुटी दूर करण्याचे काम तब्बल दोन महिने लागले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज