औरंगाबाद: मामाच्या गावाला जाण्यासाठी आतूर होऊन बसलेल्या बच्चेकंपनीसाठी खूषखबर. यंदा उन्हाळी सुटीसाठी राज्यभरात १४५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात औरंगाबाद विभागातून ४३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात मुंबईहून २४, पुण्यातून १४, नाशिक ४४, नागपूरहून ७ बस सोडण्यात येणार आहेत. औरंगाबादहून नागपूर, सोलापूर, बुलढाणा, अक्कलकोट, पुणे आदी मार्गावर जादा बस सोडण्याची परवानगी मुंबई सेंट्रलमधून देण्यात आली. याशिवाय प्रवासी संख्या वाढल्यास त्यानुसार जादा बस सोडण्याची तयारी औरंगाबाद विभागाने केली आहे.
उन्हाळी सुट्यांसाठी १४५ जादा बस
मामाच्या गावाला जाण्यासाठी आतूर होऊन बसलेल्या बच्चेकंपनीसाठी खूषखबर यंदा उन्हाळी सुटीसाठी राज्यभरात १४५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Times 21 Mar 2018, 3:14 pm