म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागेश्वरवाडी परिसरात एका कंपनीत काम करून स्पर्धा परीक्षेतून 'पीएसआय' होण्याची तयारी करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (२१ जानेवारी) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. सागर पोपट पोळ (२२, रा. शंकरपूर, काटे-पिंपळगाव, ता. गंगापूर, ह. मु. नागेश्वरवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
सागर पोपट पोळ हा आठ दिवसांपूर्वी आपल्या गावाकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी गेला होता. काही दिवसापूर्वी बांधावर शौचावरून सागर पोळ यांच्या नातेवाईकांनी त्याच्याशी आणि त्याच्या आई-वडिलांशी वाद घातला होता. प्रकरण शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गेले होते. २० जानेवारी रोजी सागर पोळ याने त्याच्या मित्रांना गावाकडे बोलावून घेतले. मित्रासोबत सागर औरंगाबादला येत असताना, त्याला रस्त्यात अडवून वाद झालेल्या काही नातेवाईकांनी,'तुझे कॅरेटर खराब करून टाकू. तू पीएसआय कसा होतोस?' अशी धमकी दिली.
यानंतर सागर औरंगाबादला आला. रात्री त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर त्याचे वडील बोलले. २१ जानेवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास तो उठला. त्याने कंपनीला जाण्याची तयारी केली. खालच्या खोलीतील बाथरूममध्ये त्याचा सहकारी असल्याने, तो वरच्या मजल्यावरील रिकाम्या खोलीत गेला. या ठिकाणी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात सागर पोळ यांच्या नातेवाइकांनी वाद घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.
'चिंता करू नको...स'
गावातून बाहेर पडल्यानंतर सागर चिंतेत होता. बुधवारी रात्री सागरला त्याच्या वडिलांनी फोन केला. व्हिडिओ कॉल करून त्याला धीर दिला. चिंता करू नकोस. वाद मिटला आहे, असे सांगत मुलाची हिंमत बांधण्याचा प्रयत्न पोपट पोळ यांनी केला. सागरचा हा वडिलांची झालेला शेवटचा संवाद होता.
नागेश्वरवाडी परिसरात एका कंपनीत काम करून स्पर्धा परीक्षेतून 'पीएसआय' होण्याची तयारी करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (२१ जानेवारी) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. सागर पोपट पोळ (२२, रा. शंकरपूर, काटे-पिंपळगाव, ता. गंगापूर, ह. मु. नागेश्वरवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
सागर पोपट पोळ हा आठ दिवसांपूर्वी आपल्या गावाकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी गेला होता. काही दिवसापूर्वी बांधावर शौचावरून सागर पोळ यांच्या नातेवाईकांनी त्याच्याशी आणि त्याच्या आई-वडिलांशी वाद घातला होता. प्रकरण शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गेले होते. २० जानेवारी रोजी सागर पोळ याने त्याच्या मित्रांना गावाकडे बोलावून घेतले. मित्रासोबत सागर औरंगाबादला येत असताना, त्याला रस्त्यात अडवून वाद झालेल्या काही नातेवाईकांनी,'तुझे कॅरेटर खराब करून टाकू. तू पीएसआय कसा होतोस?' अशी धमकी दिली.
यानंतर सागर औरंगाबादला आला. रात्री त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर त्याचे वडील बोलले. २१ जानेवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास तो उठला. त्याने कंपनीला जाण्याची तयारी केली. खालच्या खोलीतील बाथरूममध्ये त्याचा सहकारी असल्याने, तो वरच्या मजल्यावरील रिकाम्या खोलीत गेला. या ठिकाणी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात सागर पोळ यांच्या नातेवाइकांनी वाद घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.
'चिंता करू नको...स'
गावातून बाहेर पडल्यानंतर सागर चिंतेत होता. बुधवारी रात्री सागरला त्याच्या वडिलांनी फोन केला. व्हिडिओ कॉल करून त्याला धीर दिला. चिंता करू नकोस. वाद मिटला आहे, असे सांगत मुलाची हिंमत बांधण्याचा प्रयत्न पोपट पोळ यांनी केला. सागरचा हा वडिलांची झालेला शेवटचा संवाद होता.