म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकीचे पेपर सुरू असताना आज बुधवारी नगरसेवक सिताराम सुरे यांच्या घरी बसून उत्तरपत्रिका सोडविताना तब्बल २६ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग परीक्षेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. हे सगळे पेपर द्वितीय आणि तृतीय वर्षातील पेपर होते. हे सगळे पेपर साई अभियांत्रिकी कॉलेज सेंटरचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २ मेपासून सुरुवात झाली. त्यात चक्क परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका नगरसेवकाच्या घरी सोडविताना विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी झालेला पेपर आज बुधवारी सोडविताना हे विद्यार्थी आढळल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी द्वितीय आणि अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या विविध ५ शाखांचे विविध १९ पेपर होते. त्यात द्वितीय वर्षाचे ८ तर, अंतिम वर्षाचे ९ पेपर होते. त्यापैकी बीई सिव्हिल चा हा पेपर असल्याचे कळते. साई अभियांत्रिकीचे हे विद्यार्थी असून प्राध्यापकांच्या मदतीने हे पेपर सोडविले जात असल्याचे कळते. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
पेपर कॉलेजकडेच कसे...
अभियांत्रिकीला होम सेंटर द्यायचे की नाही यावरून प्रशासनाची दुटप्पी भूमिका समोर आली. त्यात परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी पेपर विद्यापीठाकडे जमा केल्या जातात. असे असताना, कॉलेजकडे उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्याच कशा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ प्रशासनाचा बेजबाबदारपणाच अशा घटनांना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकीचे पेपर सुरू असताना आज बुधवारी नगरसेवक सिताराम सुरे यांच्या घरी बसून उत्तरपत्रिका सोडविताना तब्बल २६ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग परीक्षेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. हे सगळे पेपर द्वितीय आणि तृतीय वर्षातील पेपर होते. हे सगळे पेपर साई अभियांत्रिकी कॉलेज सेंटरचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २ मेपासून सुरुवात झाली. त्यात चक्क परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका नगरसेवकाच्या घरी सोडविताना विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी झालेला पेपर आज बुधवारी सोडविताना हे विद्यार्थी आढळल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी द्वितीय आणि अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या विविध ५ शाखांचे विविध १९ पेपर होते. त्यात द्वितीय वर्षाचे ८ तर, अंतिम वर्षाचे ९ पेपर होते. त्यापैकी बीई सिव्हिल चा हा पेपर असल्याचे कळते. साई अभियांत्रिकीचे हे विद्यार्थी असून प्राध्यापकांच्या मदतीने हे पेपर सोडविले जात असल्याचे कळते. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
पेपर कॉलेजकडेच कसे...
अभियांत्रिकीला होम सेंटर द्यायचे की नाही यावरून प्रशासनाची दुटप्पी भूमिका समोर आली. त्यात परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी पेपर विद्यापीठाकडे जमा केल्या जातात. असे असताना, कॉलेजकडे उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्याच कशा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ प्रशासनाचा बेजबाबदारपणाच अशा घटनांना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.