म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
बजाज अॅटो औरंगाबाद येथील दुचाकी व तीन चाकी वाहनांचे उत्पादन १९८७ पासून सुरू आहे. यातील अडीचशे अस्थाई कामगारांनी कामगार न्यायालयात दाद मागितली असता अडीचशे कामगारांना साडेतीन कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे काम अथवा मोबदला देण्यात यावा असे म्हटलेले आहे. त्यानुसार कामगार न्यायालयाच्या निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो.
बजाजमध्ये १९८९ ते १९९९ पर्यंत सात महिन्यांची नियुक्ती देत हजारो तात्पुरत्या कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. पाच महिन्यांचा खंड दिला जात होता. याविरोधात १८०० कामगारांनी औद्योगिक न्यायालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. औद्योगिक व उच्च न्यायालयाने सर्वांना काम द्यावे, असे आदेशित केले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने कामाऐवजी नुकसान भरपाई देण्यासंबधी आदेशित केले होते. संबंधित निर्णयाचे अनुषंगाने कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेतली असता त्यांनाही कामावर घेणयासंबंधी किंवा भरपाई देण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा कामगार न्यायालयाने कामाऐवजी नुकसान भरपाई देण्याचे आदेशित करण्यात आले. या निर्णयाच्या अनुषंगाने पन्नास कामगारांना भरपाई देण्यात आली. या निर्णयानुसार २५० कामगारांना साडेतीन कोटी रुपये मिळणार असल्याचे बापू कावरे यांनी सांगितले. त्यांना नितीन ढोबळे यांनी सहकार्य केले.
बजाज अॅटो औरंगाबाद येथील दुचाकी व तीन चाकी वाहनांचे उत्पादन १९८७ पासून सुरू आहे. यातील अडीचशे अस्थाई कामगारांनी कामगार न्यायालयात दाद मागितली असता अडीचशे कामगारांना साडेतीन कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे काम अथवा मोबदला देण्यात यावा असे म्हटलेले आहे. त्यानुसार कामगार न्यायालयाच्या निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो.
बजाजमध्ये १९८९ ते १९९९ पर्यंत सात महिन्यांची नियुक्ती देत हजारो तात्पुरत्या कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. पाच महिन्यांचा खंड दिला जात होता. याविरोधात १८०० कामगारांनी औद्योगिक न्यायालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. औद्योगिक व उच्च न्यायालयाने सर्वांना काम द्यावे, असे आदेशित केले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने कामाऐवजी नुकसान भरपाई देण्यासंबधी आदेशित केले होते. संबंधित निर्णयाचे अनुषंगाने कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेतली असता त्यांनाही कामावर घेणयासंबंधी किंवा भरपाई देण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा कामगार न्यायालयाने कामाऐवजी नुकसान भरपाई देण्याचे आदेशित करण्यात आले. या निर्णयाच्या अनुषंगाने पन्नास कामगारांना भरपाई देण्यात आली. या निर्णयानुसार २५० कामगारांना साडेतीन कोटी रुपये मिळणार असल्याचे बापू कावरे यांनी सांगितले. त्यांना नितीन ढोबळे यांनी सहकार्य केले.