अ‍ॅपशहर

औरंगाबादमध्ये ५ बाधितांचा मृत्यू; हिंगोलीत ८ नवे करोना रुग्ण सापडले

गेल्या ९ तासांत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोडमधील एकाचा समावेश आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त झाल्याने आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर हिंगोलीत मुंबई, पुणे आणि रायगड येथून आलेल्या ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2020, 3:46 pm
औरंगाबाद: गेल्या ९ तासांत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोडमधील एकाचा समावेश आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त झाल्याने आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर हिंगोलीत मुंबई, पुणे आणि रायगड येथून आलेल्या ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हिंगोलीतील करोना रुग्णांची संख्या १६९ झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus


औरंगाबाद येथे आज करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे. कटकट गेट येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा २४ मे रोजी आणि गारखेडा येथील ४८वर्षीय रुग्णाचा २४ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील ३५ वर्षीय महिलेचा, कैलास नगरातील ७५ वर्षीय महिलेचा पहाटे सव्वा तीन वाजता आणि सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा पहाटे साडे सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत ५० करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात ७० करोनबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.

नागपुरात करोनाचा आठवा बळी; रुग्णसंख्या ४२६

हिंगोलीत मुंबई, पुण्याहून आलेल्यांना करोना

हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील ८ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई, पुणे व रायगड येथून हिंगोलीत आलेले हे सर्व रुग्ण आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकुण संख्याल१६९ झाली असून त्यापैकी ९० व्यक्ती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिंगोली शहरासह जिल्ह्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद व अन्य मोठ्या शहरामध्ये कामानिमित्त असलेले नागरिक गावाकडे परतत आहेत. कळमनुरी तालुक्यात महिनाभरापूर्वी एकच रुग्ण आढळून आला होता.

करोनाग्रस्त मंत्र्याला लालफितीचा फटका; विमानाची परवानगी नाकारली!

दरम्यान, कळमनुरी तालुक्यात मुंबईहून ४, रायगडहून आलेले ३ व पुण्यातुन आलेला एक अशा ८ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. औरंगाबादला उपचार सुरू असलेला एक एसआरपीएफ जवान करोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या औरंगाबादमध्ये एक तर हिंगोली जिल्ह्यात ६८रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शरद पवार अचानक राज्यपालांना भेटले; चर्चा तर होणारच!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज