अ‍ॅपशहर

दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार

औरंगाबाद आणि यवतमाळ येथे आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Times 14 Feb 2017, 3:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 killed in separate road accidents
दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार


औरंगाबाद आणि यवतमाळ येथे आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद येथे आज दुपारी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रकाश नारायण देशपांडे (वय ४०) आणि त्यांचा मुलगा शुभम प्रकाश देशपांडे (१८) जागीच ठार झाले. देशपांडे हे आडगाव खुर्द येथील रहिवाशी आहेत. त्यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय होता. तर शुभम हा इयत्ता बारावीत शिकत होता.

दुसरा अपघात यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा येथे झाला. भरधाव ट्रॅक्टरमधील सिमेंट आणि सळ्या अंगावर पडल्यानं तिघांना प्राण गमवावा लागला. प्रशांत चौधरी, हनुमान येडमे आणि पांडूरंग येडमे अशी मृतांची नावे आहेत. तर अजय वैद्य असे जखमीचे नाव आहे. घाटंजी ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज