अ‍ॅपशहर

'पन्नास हजारांची भरपाई द्या'

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई पंधरा दिवसांत द्यावी; अन्यथा एकाही पुढाऱ्याला तालुक्यात फिरू दिले जाणार नाही, असा पवित्रा घेऊन 'संभाजी ब्रिगेड'ने बुधवारी फुलंब्री तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 7 Oct 2021, 4:26 pm
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई पंधरा दिवसांत द्यावी; अन्यथा एकाही पुढाऱ्याला तालुक्यात फिरू दिले जाणार नाही, असा पवित्रा घेऊन 'संभाजी ब्रिगेड'ने बुधवारी फुलंब्री तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 50 thousand relief package to farmers
'पन्नास हजारांची भरपाई द्या'


तालुकाध्यक्ष योगेश पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नायब तहसीलदार कचरू काथार याना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पीक कर्ज माफ करावे, रब्बीसाठी ३० टक्के वाढीव कर्ज द्यावे, जमीन वाहून गेलेल्या शेतीचे पंचनामे करावेत, पुढील विकास खत व बियाणे अनुदानात द्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून शेतकरी मुलांना व्यवसायासाठी कर्ज द्यावे, दुधाला पन्नास रुपये भाव द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

योगेश पाथ्रीकर यांनी सांगितले की, जेव्हा पेट्रोल ६० रुपये लिटर होते तेव्हा दुधाला २५ रुपये भाव होता. आज पेट्रोल १०८ रुपये झाले, तरीही दुधाला तोच भाव आहे. याची सांगड कुठेही जोडली जात नाही. यासाठी दुधाला ५० रुपये भाव द्यावा. १३ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी व ३० टक्के वाढीव कर्जाबाबत विचार करावा व तसे पत्र बँकांना देऊन; तसेच त्याची प्रत संघटनेला द्यावी. असे न झाल्यास १४ तारखेला पालफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व मदत जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. या वेळी प्रमोद ढेपले, विलास बनसोड, सुनील राऊत, उमेश चव्हाण, शेख शकीर, सुनील बन्सोड, भास्कर बन्सोड, सुरेश ढोले, सुरेश ढेपले, भारत गाडेकर आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज