अ‍ॅपशहर

औरंगाबाद: जळीतकांडातील महिलेचा मृत्यू

अंधारी येथे पेटविलेल्या महिलेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत ही महिला ९५ टक्के भाजली होती. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2020, 11:18 pm
सिल्लोड: अंधारी येथे पेटविलेल्या महिलेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत ही महिला ९५ टक्के भाजली होती. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते यास अटक केली असून, त्याला दहा फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman ablaze


या प्रकरणी सिल्लोड तालुक्यातील ५० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, संबंधित पीडित महिला एकटीच राहते व तिच्या दोन्ही मुलींचे लग्न यापूर्वीच झाले आहेत. २ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११ वाजता फिर्यादी घरात एकटीच असताना गावातील आरोपी संतोष सखाराम मोहिते (५०) हा तिथे आला व त्याने फिर्यादीच्या घराचे दार वाजवले. दार उघडताच समोर आरोपी संतोष दिसल्यामुळे, ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे’ असे ती त्याला म्हणाली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला.

वाचा: औरंगाबादमधील जळीत कांड वैयक्तिक संबंधातून: गृहमंत्री
वाचा: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जिवंत जाळले
वाचा: जळीत पीडितेसाठी मुंबईतून ‘बर्न स्पेशालिस्ट’

गंभीर जखमी झालेल्या महिलेला सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर या महिलेची उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज