अ‍ॅपशहर

देशात प्रामाणिकतेचा पुरावा मागितला जातोय: इम्तियाज जलील

देशातील राजकीय वातावरण व परिस्थिती पाहता देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. आज देशामध्ये प्रामाणिकतेचा पुरावा मागितला जात आहे. देशात सध्या प्रचंड महागाई, रोजगाराचे प्रश्न असताना यावर कुणीच बोलायला तयार नाही, सत्ताधारी संख्याबळाच्या जोरावर निर्णय घेत असून देशाला पाकिस्तान सारखं बनवण्यात येत असल्याचे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स 29 Dec 2019, 9:06 pm
औरंगाबाद : देशातील राजकीय वातावरण व परिस्थिती पाहता देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. आज देशामध्ये प्रामाणिकतेचा पुरावा मागितला जात आहे. देशात सध्या प्रचंड महागाई, रोजगाराचे प्रश्न असताना यावर कुणीच बोलायला तयार नाही, सत्ताधारी संख्याबळाच्या जोरावर निर्णय घेत असून देशाला पाकिस्तान सारखं बनवण्यात येत असल्याचे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalil


मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ व प्रगतिशील लेखक संघ आयोजित डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या 'मी टेकले नाही हात अजून' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (२९ डिसेंबर) जलील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रगतीलश लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, प्राचार्य प्रतापराव बोराडे यांची उपस्थिती होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज