म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेने एकमताने मंजूर करून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. या ठरावाला मंजुरी देण्याची आठवण केंद्र सरकारला करून द्यावी लागेल. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर लवकरच विमानतळाच्या बारशाचा कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.
महापालिकेच्या नूतनीकरण केलेल्या संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते म्हणाले, 'संभाजीनगर' या नावाचा प्रश्न आहेच. औरंगाबादच्या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे विमानतळ असे करण्याचा ठराव दिल्ली दरबारी दाखल आहे, आता त्यांना हा ठराव मंजूर करण्याची आठवण करुन द्यावी लागेल. विकास कामांमध्ये राजकारण नको. महाराष्ट्र सरकारच्या दारी अडलेली कामे मला सांगा, दिल्लीचे प्रश्न डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांना सांगा. आपण वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी, जनतेची कामे करण्यासाठी आपली एकजूट असली पाहिजे.
संत एकनाथ महाराजांच्या 'विंचु चावला' या भारुडाची आठवण मुख्यमंत्र्यांनी या वेळी करुन दिली. ते म्हणाले, हे भारुड महत्त्वाचे आहे. चावलेल्या विंचवाचा उतारादेखील त्यांनी सांगितला आहे. तमो गुण बाजूला सारा असे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. नाथांनी सांगितलेला उतारा आपण लक्षात घेतला नाही तर, आपला उतारा सुरु होईल असा इशारा त्यांनी दिला.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, औरंगाबाद राज्यातील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कुठेही मागे नाही हे सिद्ध करण्यासाठी औरंगाबादमध्ये मेट्रो प्रकल्प राबवला जाणार असून त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी सभापती राजू वैद्य, राजू शिंदे, माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, अंकिता विधाते, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी आभार मानले. लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
तीन बेल वाजल्या अन् पडदा उघडला
लोकार्पण सोहळ्याची सुरुवात नाट्य परंपरा जपत करण्यात आली. नाटक सुरु होताना तीन बेल आणि घंटा वाजवली जाते, अगदी तशाच पद्धतीने तीन बेल आणि घंटा वाजवून रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांना मंचावर बोलावण्यात आले. सुभाष देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी
करोना संबंधीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोजक्याच निमंत्रितांना कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता आले. रंगमंदिराच्या प्रवेशद्वारावर कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येकाकडे लसीकरणाच्या प्रमाणपत्राबद्दल चौकशी केली जात होती. प्रमाणपत्र दाखवले तरच प्रवेश दिला जात होता, त्याशिवाय थर्मलगनच्या सहाय्याने प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजले जात होते.
-
ओळई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागरिकांशी संवाद साधला.
औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेने एकमताने मंजूर करून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. या ठरावाला मंजुरी देण्याची आठवण केंद्र सरकारला करून द्यावी लागेल. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर लवकरच विमानतळाच्या बारशाचा कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.
महापालिकेच्या नूतनीकरण केलेल्या संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते म्हणाले, 'संभाजीनगर' या नावाचा प्रश्न आहेच. औरंगाबादच्या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे विमानतळ असे करण्याचा ठराव दिल्ली दरबारी दाखल आहे, आता त्यांना हा ठराव मंजूर करण्याची आठवण करुन द्यावी लागेल. विकास कामांमध्ये राजकारण नको. महाराष्ट्र सरकारच्या दारी अडलेली कामे मला सांगा, दिल्लीचे प्रश्न डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांना सांगा. आपण वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी, जनतेची कामे करण्यासाठी आपली एकजूट असली पाहिजे.
संत एकनाथ महाराजांच्या 'विंचु चावला' या भारुडाची आठवण मुख्यमंत्र्यांनी या वेळी करुन दिली. ते म्हणाले, हे भारुड महत्त्वाचे आहे. चावलेल्या विंचवाचा उतारादेखील त्यांनी सांगितला आहे. तमो गुण बाजूला सारा असे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. नाथांनी सांगितलेला उतारा आपण लक्षात घेतला नाही तर, आपला उतारा सुरु होईल असा इशारा त्यांनी दिला.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, औरंगाबाद राज्यातील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कुठेही मागे नाही हे सिद्ध करण्यासाठी औरंगाबादमध्ये मेट्रो प्रकल्प राबवला जाणार असून त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी सभापती राजू वैद्य, राजू शिंदे, माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, अंकिता विधाते, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी आभार मानले. लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
तीन बेल वाजल्या अन् पडदा उघडला
लोकार्पण सोहळ्याची सुरुवात नाट्य परंपरा जपत करण्यात आली. नाटक सुरु होताना तीन बेल आणि घंटा वाजवली जाते, अगदी तशाच पद्धतीने तीन बेल आणि घंटा वाजवून रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांना मंचावर बोलावण्यात आले. सुभाष देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी
करोना संबंधीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोजक्याच निमंत्रितांना कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता आले. रंगमंदिराच्या प्रवेशद्वारावर कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येकाकडे लसीकरणाच्या प्रमाणपत्राबद्दल चौकशी केली जात होती. प्रमाणपत्र दाखवले तरच प्रवेश दिला जात होता, त्याशिवाय थर्मलगनच्या सहाय्याने प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजले जात होते.
-
ओळई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागरिकांशी संवाद साधला.