म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माजी खासदार शेट्टी हे मंगळवारी विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौऱ्यानंतर औरंगाबादमध्ये आले होते. त्यानिमित्त घेतलेल्या कार्यकर्त्यांची बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण असताना पुन्हा भाजपचे सरकार बहुमतांनी आल्याचे आश्चर्य वाटते. हा खेळ 'इव्हीएमचा'च असावा, अशी शंका येते. शेतकरी आमच्या सोबत असून त्यांनी योग्य ठिकाणीच मते दिली आहेत, मग त्यांची मते कोठे गेली याचा शोध घ्यावा लागणार आहे. ३७० मतदारसंघातील मतमोजणीत तफावत कशी आली याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सदाभाऊ खोत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले. 'कुंभाराला काय माहिती हे मडके कच्चे निघणार म्हणून; दोष कुंभाराचा नाही, तर दोष त्या मातीचा आहे. मध्यंतरीचे एक-दीड वर्ष सोडल्यास मी सतत सरकारच्या विरोधातच काम केले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा पश्चाताप नाही, उलट आता जोमाने काम करणार आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.
दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मराठवाड्याला दुष्काळाची मोठी झळ बसूनही सरकार गंभीर नाही. सरकारने ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला पण उपाययोजना करण्यात कमी पडले, अशी टीका शेट्टी यांनी केली. सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या नावे बँकेत पैसे जमा झाले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेला माणिक कदम, कृष्णा साबळे, प्रताप पोकळे आदी उपस्थित होते.
शेतकरी, सरकारला अधिकाऱ्यांनी फसवले
पंतप्रधान वीमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच होती. २०१६-१७ या वर्षी विम्यापोटी शासनाने १७ हजार ४८२ कोटी रुपये जमा केले, मात्र शेतकऱ्यांना फक्त ४२०९ कोटी रुपयेच मिळाले. २०१७-१८ यावर्षी २० हजार ७०८ कोटी रुपये शासनाने विम्यासाठी भरले, त्यापैकी ४२९१ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले. विमा कंपन्यांनी दोन वर्षांत १९ हजार ४०९ कोटींचा नफा कमावल्याचा दावा शेट्टी यांनी केला. पीक विमा कंपन्यांनी बदमाशी केली असून त्यांना कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत करून शेतकरी व सरकारला फसवल्याचा आरोप त्यांनी केला.
..तर, मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक
मराठवाड्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जळालेल्या फळबागांचे आठ दिवसात सर्वेक्षण करून पंचनामा करावा अन्यथा आठ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या घरावर शेतकऱ्यांसह धडक देऊ, असा इशारा त्यांनी दिला. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मिळावेत, खरीप पिकाचे कर्ज एक महिन्यात शेतकऱ्यांना वितरित करावे, या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयास शेतकऱ्यांसह बेमुदत घेराव घालण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.
सदाभाऊ खोत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले. 'कुंभाराला काय माहिती हे मडके कच्चे निघणार म्हणून; दोष कुंभाराचा नाही, तर दोष त्या मातीचा आहे. मध्यंतरीचे एक-दीड वर्ष सोडल्यास मी सतत सरकारच्या विरोधातच काम केले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा पश्चाताप नाही, उलट आता जोमाने काम करणार आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.
दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मराठवाड्याला दुष्काळाची मोठी झळ बसूनही सरकार गंभीर नाही. सरकारने ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला पण उपाययोजना करण्यात कमी पडले, अशी टीका शेट्टी यांनी केली. सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या नावे बँकेत पैसे जमा झाले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेला माणिक कदम, कृष्णा साबळे, प्रताप पोकळे आदी उपस्थित होते.
शेतकरी, सरकारला अधिकाऱ्यांनी फसवले
पंतप्रधान वीमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच होती. २०१६-१७ या वर्षी विम्यापोटी शासनाने १७ हजार ४८२ कोटी रुपये जमा केले, मात्र शेतकऱ्यांना फक्त ४२०९ कोटी रुपयेच मिळाले. २०१७-१८ यावर्षी २० हजार ७०८ कोटी रुपये शासनाने विम्यासाठी भरले, त्यापैकी ४२९१ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले. विमा कंपन्यांनी दोन वर्षांत १९ हजार ४०९ कोटींचा नफा कमावल्याचा दावा शेट्टी यांनी केला. पीक विमा कंपन्यांनी बदमाशी केली असून त्यांना कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत करून शेतकरी व सरकारला फसवल्याचा आरोप त्यांनी केला.
..तर, मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक
मराठवाड्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जळालेल्या फळबागांचे आठ दिवसात सर्वेक्षण करून पंचनामा करावा अन्यथा आठ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या घरावर शेतकऱ्यांसह धडक देऊ, असा इशारा त्यांनी दिला. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मिळावेत, खरीप पिकाचे कर्ज एक महिन्यात शेतकऱ्यांना वितरित करावे, या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयास शेतकऱ्यांसह बेमुदत घेराव घालण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.