म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांना ५२४ मते मिळाली. तर काँग्रेस आघाडीचे उमदेवार भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मते मिळाली. यावरुन या निवडणुकीत विरोधकांचे मोठ्या प्रमाणावर मतदान फुटल्याचे स्पष्ट झाले.
गुरुवारी (२२ ऑगस्ट) चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या आवारामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. अवघ्या ४५ मिनिटांमध्ये मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाले. एकूण झालेल्या ६४७ मतांपैकी १४ मते अवैध ठरल्याने ६३३ मते वैध ठरवण्यात आली. त्यामुळे ३१७ हा विजयी होण्यासाठी कोटा ठरला, मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर दानवे यांना ५२४ मते मिळाली तर बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना केवळ ३ मते मिळाली. दानवे यांना मिळालेल्या मतदानावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएम पक्षाचेही मतदान दानवेंना मिळाले हे स्पष्ट होते. शिवसेना- भाजपचे २९२ मतदान होते तर सुमारे ४० ते ४५ अपक्ष तसेच इतरांचा पाठिंबा असे एकूण ३३३ मतदानाचे गणित महायुतीचे होते. मात्र, तब्बल १९१ अधिकचे मतदान घेऊन दानवे यांनी विजयश्री आपल्याकडे खेचून आणली. बाबुराव कुलकर्णी यांना स्वतःचे मतदानही पारड्यात पाडून घेता आले नाही, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणुकीत बळजबरीने उमेदवार लादल्याचे निकालावरुन स्पष्ट होते.
सव्वा दहा वाजता जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी अंबादास दानवे यांना विजयी घोषित केले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. दानवे यांना विजयी घोषित केल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे मतमोजणीच्या ठिकाणी आगमन झाले त्यानंतर दानवे यांच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली.
गुरुवारी (२२ ऑगस्ट) चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या आवारामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. अवघ्या ४५ मिनिटांमध्ये मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाले. एकूण झालेल्या ६४७ मतांपैकी १४ मते अवैध ठरल्याने ६३३ मते वैध ठरवण्यात आली. त्यामुळे ३१७ हा विजयी होण्यासाठी कोटा ठरला, मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर दानवे यांना ५२४ मते मिळाली तर बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना केवळ ३ मते मिळाली. दानवे यांना मिळालेल्या मतदानावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएम पक्षाचेही मतदान दानवेंना मिळाले हे स्पष्ट होते. शिवसेना- भाजपचे २९२ मतदान होते तर सुमारे ४० ते ४५ अपक्ष तसेच इतरांचा पाठिंबा असे एकूण ३३३ मतदानाचे गणित महायुतीचे होते. मात्र, तब्बल १९१ अधिकचे मतदान घेऊन दानवे यांनी विजयश्री आपल्याकडे खेचून आणली. बाबुराव कुलकर्णी यांना स्वतःचे मतदानही पारड्यात पाडून घेता आले नाही, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणुकीत बळजबरीने उमेदवार लादल्याचे निकालावरुन स्पष्ट होते.
सव्वा दहा वाजता जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी अंबादास दानवे यांना विजयी घोषित केले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. दानवे यांना विजयी घोषित केल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे मतमोजणीच्या ठिकाणी आगमन झाले त्यानंतर दानवे यांच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली.