म. टा. प्रतिनिधी, पैठण
दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षीच्या नाथषष्ठीत भाविक व वारकऱ्यांची संख्या कमी होणार, असा समज खोटा ठरला. नाथषष्ठी यात्रेत मंगळवारी पहिल्या दिवशी विक्रमी चार लाखांपेक्षा जास्त भाविक व वारकरी, २१ मानाच्या दिंड्या व ५५० पेक्षा जास्त पायी दिंड्या शहरात दाखल झाल्या आहेत.
मराठवाडा व राज्यातील बहुतांश विभागात दुष्काळ असल्याने भाविकांची संख्या घटेल,असा पैठणकर व प्रशासनाचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर चार लाखांपेक्षा जास्त भाविक पायी दिंड्या, एस. टी. बस, खासगी वाहनाने दाखल झाले. यामुळे सर्व रस्ते वारकरी व भाविकांनी अक्षरशः फुलले आहेत. नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लाब दर्शन रांग लागली. मंगळवारी सायंकाळपर्यंत चार लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले. यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी दुपारी गावातील नाथ मंदिरापासून नाथ समाधी मंदिरापर्यंत निर्वाण दिंडी काढण्यात आली.
घोडा, जरीपटका, भानुदास महाराजाचे निशाण, झेंडेकरी, विणेकरी, अमृतराय संस्थांची छत्री, नाथवंशजाच्या छत्र्या, संस्थानिक अमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवानगडची दिंडी आदी सहभागी झाले. या निर्वाण दिंडीने कावळे गल्ली, उदासी महाराज मठ या मार्गावरून जाऊन समाधी मंदिरात पश्चिम द्वाराने प्रवेश केला. ही परंपरा ४१७ वर्षांपासून सुरू आहे. यावेळी नाथ महाराजांनी रचलेले ‘अवघे चित्रलौक्या आनंदची’ हे कीर्तन करण्यात आला. बुधवारी रात्री बारा वाजता परंपरेनुसार छबिना मिरवणूक व महोत्सवाच्या अंतिम दिवशी गुरुवारी दही हंडी फोडून नाथषष्ठीची सांगता होणार आहे.
दरवर्षी यात्रेनिमित्त गोदावरी नदीमध्ये वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी पाणी सोडले जाते. यावर्षी धरणाचा मृतसाठा असल्याने नदीमध्ये पाणी सोडलेले नाही. नदीत अत्यंत कमी व वास येणारे पाणी असल्याने वारकऱ्यांनी धरणात स्नान केले. स्नानासाठी मंगळवारी सकाळी धरणावर मोठी गर्दी झाली होती.
यात्रेत ५०० फिरते शौचालय, नदीपात्रात ५०० तात्पुरते नळ कनेक्शन, विविध विभागाचे सुमारे ५० टँकरने पाणी आदी घोषणा नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी आढावा बैठकीत केली होती. मात्र, प्रत्यक्षात एकही फिरते शौचालय निदर्शनास आले नाही. परिणामी, अनेक वारकरी उघड्यावर जात असल्याचे पाहण्यास मिळाले. यात्रा मैदानात मोजकेच तात्पुरते नळ लावण्यात आले आहेत. पाण्याचे टँकर अपवादानेच दिसले, असे वारकऱ्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षीच्या नाथषष्ठीत भाविक व वारकऱ्यांची संख्या कमी होणार, असा समज खोटा ठरला. नाथषष्ठी यात्रेत मंगळवारी पहिल्या दिवशी विक्रमी चार लाखांपेक्षा जास्त भाविक व वारकरी, २१ मानाच्या दिंड्या व ५५० पेक्षा जास्त पायी दिंड्या शहरात दाखल झाल्या आहेत.
मराठवाडा व राज्यातील बहुतांश विभागात दुष्काळ असल्याने भाविकांची संख्या घटेल,असा पैठणकर व प्रशासनाचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर चार लाखांपेक्षा जास्त भाविक पायी दिंड्या, एस. टी. बस, खासगी वाहनाने दाखल झाले. यामुळे सर्व रस्ते वारकरी व भाविकांनी अक्षरशः फुलले आहेत. नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लाब दर्शन रांग लागली. मंगळवारी सायंकाळपर्यंत चार लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले. यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी दुपारी गावातील नाथ मंदिरापासून नाथ समाधी मंदिरापर्यंत निर्वाण दिंडी काढण्यात आली.
घोडा, जरीपटका, भानुदास महाराजाचे निशाण, झेंडेकरी, विणेकरी, अमृतराय संस्थांची छत्री, नाथवंशजाच्या छत्र्या, संस्थानिक अमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवानगडची दिंडी आदी सहभागी झाले. या निर्वाण दिंडीने कावळे गल्ली, उदासी महाराज मठ या मार्गावरून जाऊन समाधी मंदिरात पश्चिम द्वाराने प्रवेश केला. ही परंपरा ४१७ वर्षांपासून सुरू आहे. यावेळी नाथ महाराजांनी रचलेले ‘अवघे चित्रलौक्या आनंदची’ हे कीर्तन करण्यात आला. बुधवारी रात्री बारा वाजता परंपरेनुसार छबिना मिरवणूक व महोत्सवाच्या अंतिम दिवशी गुरुवारी दही हंडी फोडून नाथषष्ठीची सांगता होणार आहे.
दरवर्षी यात्रेनिमित्त गोदावरी नदीमध्ये वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी पाणी सोडले जाते. यावर्षी धरणाचा मृतसाठा असल्याने नदीमध्ये पाणी सोडलेले नाही. नदीत अत्यंत कमी व वास येणारे पाणी असल्याने वारकऱ्यांनी धरणात स्नान केले. स्नानासाठी मंगळवारी सकाळी धरणावर मोठी गर्दी झाली होती.
यात्रेत ५०० फिरते शौचालय, नदीपात्रात ५०० तात्पुरते नळ कनेक्शन, विविध विभागाचे सुमारे ५० टँकरने पाणी आदी घोषणा नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी आढावा बैठकीत केली होती. मात्र, प्रत्यक्षात एकही फिरते शौचालय निदर्शनास आले नाही. परिणामी, अनेक वारकरी उघड्यावर जात असल्याचे पाहण्यास मिळाले. यात्रा मैदानात मोजकेच तात्पुरते नळ लावण्यात आले आहेत. पाण्याचे टँकर अपवादानेच दिसले, असे वारकऱ्यांनी सांगितले.