म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पीककर्जाचे पुनर्गठण करून नवीन कर्जासाठी अडवणूक होत असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेतर्फे सोमवारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कार्यालयावर भरपावसात मोर्चा काढण्यात आला.
मराठवाड्यातील गंभीर दुष्काळाची दखल घेऊन रिझर्व बँक ऑफ इंडिया व नाबार्डने शेतकऱ्यांना पीककर्जाचे पुनर्गठण करून नवीन कर्ज देण्याचे दिले आहेत. मात्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विविध शाखांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप आहे. हा मोर्चा सिडको कार्यालयापासून निघून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कार्यालयावर दुपारी साडेबारा वाजता धडकला. परभणी, बीड, जालना, लातूर, नांदेड आदी भागातील शेतकरी व कुटुंबीयांनी अडवणूक होत असल्याच्या तक्रारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेकडे केल्या आहेत. या मोर्च्यात फुलंब्री आणि गंगापूर तालुक्यातील सुमारे २०० शेतकरी सहभागी झाले होते. भाकप राज्य सचिव कॉ. भालचंद्र कानगो, जिल्हा सचिव कॉ. प्रा. राम बाहेती, परभणी जिल्हा सचिव कॉ. राजन क्षीरसागर, शहर सचिव कॉ. भास्कर लहाने, किसान सभेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक जाधव यांनी नेतृत्व केले.
पीककर्जाचे पुनर्गठण करून नवीन कर्जासाठी अडवणूक होत असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेतर्फे सोमवारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कार्यालयावर भरपावसात मोर्चा काढण्यात आला.
मराठवाड्यातील गंभीर दुष्काळाची दखल घेऊन रिझर्व बँक ऑफ इंडिया व नाबार्डने शेतकऱ्यांना पीककर्जाचे पुनर्गठण करून नवीन कर्ज देण्याचे दिले आहेत. मात्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विविध शाखांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप आहे. हा मोर्चा सिडको कार्यालयापासून निघून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कार्यालयावर दुपारी साडेबारा वाजता धडकला. परभणी, बीड, जालना, लातूर, नांदेड आदी भागातील शेतकरी व कुटुंबीयांनी अडवणूक होत असल्याच्या तक्रारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेकडे केल्या आहेत. या मोर्च्यात फुलंब्री आणि गंगापूर तालुक्यातील सुमारे २०० शेतकरी सहभागी झाले होते. भाकप राज्य सचिव कॉ. भालचंद्र कानगो, जिल्हा सचिव कॉ. प्रा. राम बाहेती, परभणी जिल्हा सचिव कॉ. राजन क्षीरसागर, शहर सचिव कॉ. भास्कर लहाने, किसान सभेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक जाधव यांनी नेतृत्व केले.