म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौरपदाच्या आगामी निवडणुकीने भारतीय जनता पक्षाची कोंडी केली आणि बेगमपुरा वॉर्डात शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेत्यांना ऐनवेळी घ्यावा लागला. युती झाली तरी प्रचारात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्डाची पोटनिवडणूक २८ ऑगस्ट रोजी होत आहे. ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने केली होती. एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या निवडणूकीत बेगमपुरा-पहाडसिंगपुरा हा वॉर्ड युतीमध्ये शिवसेनेसाठी सुटला होता. पण शिवसेनेचा त्यावेळी पराभव झाला. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्या वॉर्डातून भाजपला संधी दिली पाहिजे, असा आग्रह भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी धरला होता. शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी शांत रहात भाजपला आपल्या जाळ्यात ओढले. मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप-शिवसेनेकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी झाली होती. पण बेगमपुरा वॉर्डातून शिवसेनेने खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आणि भाजपने आखलेले गणित बिघडले. दोन महिन्यांनी महापौरपदाची निवडणूक होणार आहे.
निवडणुकीच्या नंतरचे महापौरपद भाजपच्या वाट्याला आले आहे. बेगमपुरा वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत भाजपने काही दगाफटका केला, तर महापौरपद भाजपला मिळू द्यायचे नाही, अशी रणनिती शिवसेनेने ठरविल्याचे बोलले जात होते. विद्यमान महापौर त्र्यंबक तुपे यांनी राजीमाना दिलाच नाही, तर नवीन महापौरांच्या निवडणुकीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. भाजपला आपला महापौर व्हावा, असे वाटत असेल, तर त्यांनी बेगमपुरा वॉर्डात युती करून शिवसेनेचा उमेदवार स्वाकारावा, असा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मांडण्यात आला. तो प्रस्ताव मान्यही करण्यात आला.
बागडे यांचा फोन
उमेदवारी अर्ज भरण्याचा वेळ संपण्याच्या एक तास अगोदर भाजप नेते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा महापालिकेत येऊन बसलेल्या शिवसेना नेत्यांना व भाजपच्या नेत्यांना फोन आला. युती झाली असून शिवसेनेने बेगमपुरा वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे त्यांनी या नेत्यांना सांगितले. बागडे यांच्या फोनमुळे बेगमपुरा वॉर्डात शिवसेनेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
महापौरपदाच्या आगामी निवडणुकीने भारतीय जनता पक्षाची कोंडी केली आणि बेगमपुरा वॉर्डात शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेत्यांना ऐनवेळी घ्यावा लागला. युती झाली तरी प्रचारात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्डाची पोटनिवडणूक २८ ऑगस्ट रोजी होत आहे. ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने केली होती. एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या निवडणूकीत बेगमपुरा-पहाडसिंगपुरा हा वॉर्ड युतीमध्ये शिवसेनेसाठी सुटला होता. पण शिवसेनेचा त्यावेळी पराभव झाला. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्या वॉर्डातून भाजपला संधी दिली पाहिजे, असा आग्रह भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी धरला होता. शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी शांत रहात भाजपला आपल्या जाळ्यात ओढले. मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप-शिवसेनेकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी झाली होती. पण बेगमपुरा वॉर्डातून शिवसेनेने खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आणि भाजपने आखलेले गणित बिघडले. दोन महिन्यांनी महापौरपदाची निवडणूक होणार आहे.
निवडणुकीच्या नंतरचे महापौरपद भाजपच्या वाट्याला आले आहे. बेगमपुरा वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत भाजपने काही दगाफटका केला, तर महापौरपद भाजपला मिळू द्यायचे नाही, अशी रणनिती शिवसेनेने ठरविल्याचे बोलले जात होते. विद्यमान महापौर त्र्यंबक तुपे यांनी राजीमाना दिलाच नाही, तर नवीन महापौरांच्या निवडणुकीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. भाजपला आपला महापौर व्हावा, असे वाटत असेल, तर त्यांनी बेगमपुरा वॉर्डात युती करून शिवसेनेचा उमेदवार स्वाकारावा, असा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मांडण्यात आला. तो प्रस्ताव मान्यही करण्यात आला.
बागडे यांचा फोन
उमेदवारी अर्ज भरण्याचा वेळ संपण्याच्या एक तास अगोदर भाजप नेते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा महापालिकेत येऊन बसलेल्या शिवसेना नेत्यांना व भाजपच्या नेत्यांना फोन आला. युती झाली असून शिवसेनेने बेगमपुरा वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे त्यांनी या नेत्यांना सांगितले. बागडे यांच्या फोनमुळे बेगमपुरा वॉर्डात शिवसेनेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.