म. टा. प्रतिनिधी, सातारा
गेल्या तीन वर्षांपासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे शासनस्तरावर व सामाजिक संघटनांनी पाण्याचा एक-एक थेंब वाचवण्यासाठी प्रयत्न केले. यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे नदी, नाले, विहिरींना पाणी आले. दुसरीकडे सातारा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाइपलाइन महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून गळत असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
सातारा गावातील ४० गल्ल्यांमधील १०३८ कुटुंबांना या विहिरीतून नळाद्वारे पाणी पुरवले जाते. या विहिरीच्या बाजूलाच जलयुक्त शिवाराअंतर्गत खोलीकरण व रुंदीकरण केल्याने विहिरीची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे. तसेच खोलीकरण केलेल्या भागातून पाणी विहिरीत पडत असते. त्यामुळे दीड ते दोन महिन्यात एकदा पाणी मिळणाऱ्या गावातील १० ते १२ गल्ल्यांना दररोज दीड तास १२.५ एचपीच्या मोटारीने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, हे करीत असताना विहिरीतील पाइप लिकेज असल्याने कारंजाचे फवारे उडत असून, यातील काही पाणी पुन्हा विहिरीत, तर काही विहिरीच्या बाहेर पडून वाया जात आहे. तसेच गावातील पाइपलाइनही जुनी झाली असून, पाण्याचा दाब वाढला की पाइपलाइन फुटते. त्यामुळे पाणी वाया जाते. महानगरपालिकेने लिकेजची तातडीने दुरूस्ती करून पाइपलाइन नवीन टाकण्याची मागणी सोमीनाथ शिराणे यांनी केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे शासनस्तरावर व सामाजिक संघटनांनी पाण्याचा एक-एक थेंब वाचवण्यासाठी प्रयत्न केले. यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे नदी, नाले, विहिरींना पाणी आले. दुसरीकडे सातारा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाइपलाइन महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून गळत असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
सातारा गावातील ४० गल्ल्यांमधील १०३८ कुटुंबांना या विहिरीतून नळाद्वारे पाणी पुरवले जाते. या विहिरीच्या बाजूलाच जलयुक्त शिवाराअंतर्गत खोलीकरण व रुंदीकरण केल्याने विहिरीची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे. तसेच खोलीकरण केलेल्या भागातून पाणी विहिरीत पडत असते. त्यामुळे दीड ते दोन महिन्यात एकदा पाणी मिळणाऱ्या गावातील १० ते १२ गल्ल्यांना दररोज दीड तास १२.५ एचपीच्या मोटारीने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, हे करीत असताना विहिरीतील पाइप लिकेज असल्याने कारंजाचे फवारे उडत असून, यातील काही पाणी पुन्हा विहिरीत, तर काही विहिरीच्या बाहेर पडून वाया जात आहे. तसेच गावातील पाइपलाइनही जुनी झाली असून, पाण्याचा दाब वाढला की पाइपलाइन फुटते. त्यामुळे पाणी वाया जाते. महानगरपालिकेने लिकेजची तातडीने दुरूस्ती करून पाइपलाइन नवीन टाकण्याची मागणी सोमीनाथ शिराणे यांनी केली आहे.