म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यासोबतच टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले आहेत. सध्या फक्त प्रतिक्विंटल २०० ते २५० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
बाजार समितीने गेल्या वर्षीपासून नागपूर-मुंबई महामार्गावरील घायगाव शिवारातील कांदा मार्केटमध्ये टोमॅटोची खरेदी सुरू केली आहे. यावर्षी ३ सप्टेंबरपासून टोमॅटोचीही आवक सुरू झाली असून आतापर्यंत जवळपास २२ हजार कॅरेट टोमॅटोची खरेदी झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. येथे सुरुवातीला २० किलोच्या कॅरेटला २५० रुपये भाव मिळाला. पण, आता आवक वाढल्यानंतर भाव कमालीचे घरसले आहेत. सध्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून कॅरेटमागे केवळ ४० ते ५० रुपये मिळत आहेत. त्यामुळे टोमॅटो विक्रीसाठी बाजारात आणणे सुद्धा परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तीन महिने खरेदी
गेल्या वर्षी टोमॅटो मार्केटमध्ये ३० लाख रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी आणखी तीन महिने टोमॅटो खरेदी सुरू राहणार आहे. या काळात टोमॅटोचे भाव स्थिर झाल्यास फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यासोबतच टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले आहेत. सध्या फक्त प्रतिक्विंटल २०० ते २५० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
बाजार समितीने गेल्या वर्षीपासून नागपूर-मुंबई महामार्गावरील घायगाव शिवारातील कांदा मार्केटमध्ये टोमॅटोची खरेदी सुरू केली आहे. यावर्षी ३ सप्टेंबरपासून टोमॅटोचीही आवक सुरू झाली असून आतापर्यंत जवळपास २२ हजार कॅरेट टोमॅटोची खरेदी झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. येथे सुरुवातीला २० किलोच्या कॅरेटला २५० रुपये भाव मिळाला. पण, आता आवक वाढल्यानंतर भाव कमालीचे घरसले आहेत. सध्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून कॅरेटमागे केवळ ४० ते ५० रुपये मिळत आहेत. त्यामुळे टोमॅटो विक्रीसाठी बाजारात आणणे सुद्धा परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तीन महिने खरेदी
गेल्या वर्षी टोमॅटो मार्केटमध्ये ३० लाख रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी आणखी तीन महिने टोमॅटो खरेदी सुरू राहणार आहे. या काळात टोमॅटोचे भाव स्थिर झाल्यास फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.