म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रेमावर ‘महाराष्ट्र टाइम्सची’ औरंगाबाद आवृत्ती ९ डिसेंबर रोजी, शुक्रवारी पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या आनंद सोहळ्याचे औचित्य ध्यानात घेत शुक्रवारी ‘मटा’ तर्फे फेसबुक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनात सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत रसिकांना राज्यभरातील मान्यवर कवींच्या कवितांचे रसग्रहण करता येईल. सोबतच आपल्या स्वरचित कविता ‘मटा कविसंमेलन’ या फेसबुक पेजवर अपलोड करता येतील. नवोदितांच्या दर्जेदार कवितेसाठी खास पारितोषिक ठेवण्यात आले आहे. मान्यवर साहित्यिक स्पर्धेचे परीक्षण करणार असून, पाच कवींची निवड केली जाईल. विजेत्यांना राजहंस प्रकाशनतर्फे पुस्तके भेट दिली जाणार आहेत, असे श्याम देशपांडे यांनी कळविले आहे. चला तर मग करा ही लिंक क्लिक https://www.facebook.com/मटा कविसंमेलन-217802095326586/ आणि व्हा सहभागी या अनोख्या काव्यसोहळ्यात.