म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र, राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी एबीए, डॉक्टर, वकिलांसह, पदवीधरांनी गर्दी केली आहे. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात मंगळवारी गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील सर्व गट व गणांतील सुमारे ४५० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी पैठण, वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा प्रश्न अद्याप निकाली लागलेला नाही. पण, भाजपने जिल्ह्यातील सर्व गट व गणातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास मंगळवारपासून सुरुवात केली. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार प्रशांत बंब, सरचिटणीस सुहास शिरसाट, लक्ष्मण औटे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते यांनी बंद खोलीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात सकाळी दहापासून सुरू झालेल्या मुलाखतांनी गर्दी झाली होती. सुरुवातील महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती सायंकाळपर्यंत सुरू होत्या. एका गटासाठी सरासरी पाच ते सात आणि गणासाठी पाच ते दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दिवसभरात जिल्हा परिषदेसाठी शंभर, तर पंचायत समितीसाठी साडेतीनशेच्यावर इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्याचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सांगितले.
मुलाखतींना सुरुवात
भाजपची केंद्र व राज्यात सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही जिल्ह्यात भाजपचे दोन नगराध्यक्ष निवडून आले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यात उच्चशिक्षितही मागे नाहीत. मंगळवारी दोन एमबीए तसेच दोन डॉक्टर, वकिलांनी उमेदवारी मागितली. मुलाखती दिलेल्यांमधील सुमारे ५० टक्के पदवीधर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाण्यासाठी धावपळ
जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते, इच्छुक भाजप कार्यालयात आले होते. अनेक महिला कार्यकर्त्यांबरोबर लहान मुले होती. रात्री उशीरांपर्यंत मुलाखती सुरू होत्या. पण, येथे बाहेरगावाहून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगली तारांबळ उडाली. त्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागले.
केंद्र, राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी एबीए, डॉक्टर, वकिलांसह, पदवीधरांनी गर्दी केली आहे. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात मंगळवारी गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील सर्व गट व गणांतील सुमारे ४५० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी पैठण, वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा प्रश्न अद्याप निकाली लागलेला नाही. पण, भाजपने जिल्ह्यातील सर्व गट व गणातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास मंगळवारपासून सुरुवात केली. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार प्रशांत बंब, सरचिटणीस सुहास शिरसाट, लक्ष्मण औटे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते यांनी बंद खोलीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात सकाळी दहापासून सुरू झालेल्या मुलाखतांनी गर्दी झाली होती. सुरुवातील महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती सायंकाळपर्यंत सुरू होत्या. एका गटासाठी सरासरी पाच ते सात आणि गणासाठी पाच ते दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दिवसभरात जिल्हा परिषदेसाठी शंभर, तर पंचायत समितीसाठी साडेतीनशेच्यावर इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्याचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सांगितले.
मुलाखतींना सुरुवात
भाजपची केंद्र व राज्यात सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही जिल्ह्यात भाजपचे दोन नगराध्यक्ष निवडून आले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यात उच्चशिक्षितही मागे नाहीत. मंगळवारी दोन एमबीए तसेच दोन डॉक्टर, वकिलांनी उमेदवारी मागितली. मुलाखती दिलेल्यांमधील सुमारे ५० टक्के पदवीधर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाण्यासाठी धावपळ
जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते, इच्छुक भाजप कार्यालयात आले होते. अनेक महिला कार्यकर्त्यांबरोबर लहान मुले होती. रात्री उशीरांपर्यंत मुलाखती सुरू होत्या. पण, येथे बाहेरगावाहून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगली तारांबळ उडाली. त्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागले.