म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३१० व पंचायत समितीच्या ५९८ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रांत बंद झाले. गेले काही महिने घाम गाळलेल्या उमेदवारांना आता मतमोजणीची प्रतीक्षा आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
मतदानानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व तालुक्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद तालुक्यातील यंत्रे ठेवण्यासाठी टीव्ही सेंटर परिसरातील स्ट्राँगरूम तयार करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी भारत कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश सोनी, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे यांनी ईव्हीएम सुरक्षीत ठेवण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
औरंगाबाद तालुक्यात ७२ टक्के
औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक सरासरी ७२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी भारत कदम यांनी व्यक्त केला. औरंगाबाद शहराभोवती असलेल्या या मतदारसंघात सायंकाळी पाच वाजता दीडशे बुथवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. दिवसभरात तालुक्यातील झाल्टा, पळशी, बनगाव, वडगाव कोल्हाटी येथील ३ केंद्र व रामवाडी अशा ७ ठिकाणच्या बुथवरील ईव्हीएम नादुरुस्त झाले. येथील मशीन तत्काळ बदलण्यात आले.
मतदार याद्यांत गोंधळ
राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. नावे चुकीचे असणे, दुसऱ्याच गटात किंवा गणामध्ये नाव असणे, क्रमांक चुकणे आदी प्रकारांमुळे मतदारांची दमछाक झाली. वडगाव कोल्हाटी उत्तर, वाळूज, रांजणगाव शेणपुंजी, वडगाव कोल्हाटी पश्चिम व मध्य आदी भागातील मतदारांनी या तक्रारी केल्या. औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील इतर बुथवरूनही या तक्रारी आल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३१० व पंचायत समितीच्या ५९८ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रांत बंद झाले. गेले काही महिने घाम गाळलेल्या उमेदवारांना आता मतमोजणीची प्रतीक्षा आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
मतदानानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व तालुक्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद तालुक्यातील यंत्रे ठेवण्यासाठी टीव्ही सेंटर परिसरातील स्ट्राँगरूम तयार करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी भारत कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश सोनी, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे यांनी ईव्हीएम सुरक्षीत ठेवण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
औरंगाबाद तालुक्यात ७२ टक्के
औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक सरासरी ७२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी भारत कदम यांनी व्यक्त केला. औरंगाबाद शहराभोवती असलेल्या या मतदारसंघात सायंकाळी पाच वाजता दीडशे बुथवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. दिवसभरात तालुक्यातील झाल्टा, पळशी, बनगाव, वडगाव कोल्हाटी येथील ३ केंद्र व रामवाडी अशा ७ ठिकाणच्या बुथवरील ईव्हीएम नादुरुस्त झाले. येथील मशीन तत्काळ बदलण्यात आले.
मतदार याद्यांत गोंधळ
राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. नावे चुकीचे असणे, दुसऱ्याच गटात किंवा गणामध्ये नाव असणे, क्रमांक चुकणे आदी प्रकारांमुळे मतदारांची दमछाक झाली. वडगाव कोल्हाटी उत्तर, वाळूज, रांजणगाव शेणपुंजी, वडगाव कोल्हाटी पश्चिम व मध्य आदी भागातील मतदारांनी या तक्रारी केल्या. औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील इतर बुथवरूनही या तक्रारी आल्या आहेत.