म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रात जमीन असल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडून जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील ५३ गावातील ५३३ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर एक कोटी रुपयांचा बोजा टाकण्याची कारवाई दुय्यम निबंधक कार्यालयाने सुरू केली आहे. ही कारवाई करण्यासाठी संबंधित गावातील तलाठ्यांना आदेश देण्यात आले आहेत. महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) सातबाऱ्यावर या रकमेचा बोजा टाकण्यात येणार आहे.
मागील काही वर्षात नांदूर-मधमेश्वर कालवा परिसरातील शेतजमिनीची खरेदी विक्री झाल्याची नोंद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे. परंतु, हे व्यवहार करतांना अनेक शेतकऱ्यांनी मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी जमिनी जिरायती, कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडले होते. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क व नोंदणी फी बुडाली होती. या प्रकरणांची चौकशी करतांना नोंदणीकृत जमिनीचे व्यवहार करतांना संबंधित शेतकऱ्यांनी जोडलेले पुरावे खरे नसल्याचे आढळून आले. परिणामी, जमिनीचे बाजारमूल्य, वसूल करण्यात आलेले मुद्रांक शुल्क व नोंदणी फी यामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले. या व्यवहारात मुद्रांक शुल्कामध्ये ३२ लाख ९५ हजार ३६४ रुपये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे दंड म्हणून ६० लाख ६३ हजार ६१९ रुपये व नोंदणी फी आठ लाख २७ हजार २७० रुपये वसूल करण्यासाठी सुमारे एक कोटी एक लाख ८६ हजार २५३ रुपयांचा बोजा सातबाऱ्यावर टाकण्यात येणार आहे. थकित मुद्रांक शुल्क वसुल करण्यासाठी गेल्या वर्षी तालुक्यातील ७३३ शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी १८२ शेतकऱ्यांकडून २७ लाख दोन हजार १६८ रुपये मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क वसूल करण्यात आले. उर्वरित ५५१ शेतकऱ्यांनी अद्याप थकित शुल्क न भरल्याने मुद्रांक शुल्क विभागाने त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत दस्त निष्पादित झाल्यापासून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी पक्षकारांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेचे कर्ज मिळणार नाही, अशी माहिती दुय्यम निबंधक राठोड यांनी दिली.
गावांची नावे
वक्ती, राहेगव्हाण, मुरशदपूर, हरगोविंदपूर, बाभूळगाव, नादी, जातेगाव, अव्वलगाव, कऊटगाव, सिरसगाव, किरतपूर, डवाळा, हडसपिंपळगाव, घोगरगाव, भग्गाव, सुराळा, पालखेड, वांजरगाव, वैजापूर, करंजगाव, सिद्धापूरवाडी, गाढेपिंपळगाव, जळगाव, बेलगाव, हनमंतगाव, बाबतरा, गोलवाडी, पानवी, लाडगाव, लाखगंगा, वीरगाव, सावखेडगंगा, घायगाव, भालगाव, चांदेगाव, माळीघोगरगाव, सटाणा, पुरणगाव, हिंगोणी, टेभी, हमरापूर, महालगाव, म्हस्की, दहेगाव, कांगोणी, नगिनापिंपळगाव, बाजाठाण, नांदूरढोक, खंबाळा.
मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रात जमीन असल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडून जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील ५३ गावातील ५३३ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर एक कोटी रुपयांचा बोजा टाकण्याची कारवाई दुय्यम निबंधक कार्यालयाने सुरू केली आहे. ही कारवाई करण्यासाठी संबंधित गावातील तलाठ्यांना आदेश देण्यात आले आहेत. महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) सातबाऱ्यावर या रकमेचा बोजा टाकण्यात येणार आहे.
मागील काही वर्षात नांदूर-मधमेश्वर कालवा परिसरातील शेतजमिनीची खरेदी विक्री झाल्याची नोंद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे. परंतु, हे व्यवहार करतांना अनेक शेतकऱ्यांनी मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी जमिनी जिरायती, कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडले होते. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क व नोंदणी फी बुडाली होती. या प्रकरणांची चौकशी करतांना नोंदणीकृत जमिनीचे व्यवहार करतांना संबंधित शेतकऱ्यांनी जोडलेले पुरावे खरे नसल्याचे आढळून आले. परिणामी, जमिनीचे बाजारमूल्य, वसूल करण्यात आलेले मुद्रांक शुल्क व नोंदणी फी यामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले. या व्यवहारात मुद्रांक शुल्कामध्ये ३२ लाख ९५ हजार ३६४ रुपये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे दंड म्हणून ६० लाख ६३ हजार ६१९ रुपये व नोंदणी फी आठ लाख २७ हजार २७० रुपये वसूल करण्यासाठी सुमारे एक कोटी एक लाख ८६ हजार २५३ रुपयांचा बोजा सातबाऱ्यावर टाकण्यात येणार आहे. थकित मुद्रांक शुल्क वसुल करण्यासाठी गेल्या वर्षी तालुक्यातील ७३३ शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी १८२ शेतकऱ्यांकडून २७ लाख दोन हजार १६८ रुपये मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क वसूल करण्यात आले. उर्वरित ५५१ शेतकऱ्यांनी अद्याप थकित शुल्क न भरल्याने मुद्रांक शुल्क विभागाने त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत दस्त निष्पादित झाल्यापासून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी पक्षकारांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेचे कर्ज मिळणार नाही, अशी माहिती दुय्यम निबंधक राठोड यांनी दिली.
गावांची नावे
वक्ती, राहेगव्हाण, मुरशदपूर, हरगोविंदपूर, बाभूळगाव, नादी, जातेगाव, अव्वलगाव, कऊटगाव, सिरसगाव, किरतपूर, डवाळा, हडसपिंपळगाव, घोगरगाव, भग्गाव, सुराळा, पालखेड, वांजरगाव, वैजापूर, करंजगाव, सिद्धापूरवाडी, गाढेपिंपळगाव, जळगाव, बेलगाव, हनमंतगाव, बाबतरा, गोलवाडी, पानवी, लाडगाव, लाखगंगा, वीरगाव, सावखेडगंगा, घायगाव, भालगाव, चांदेगाव, माळीघोगरगाव, सटाणा, पुरणगाव, हिंगोणी, टेभी, हमरापूर, महालगाव, म्हस्की, दहेगाव, कांगोणी, नगिनापिंपळगाव, बाजाठाण, नांदूरढोक, खंबाळा.