म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्धनच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, दयामाया दाखवू नका, अशी मागणी मृत वर्धन घोडे याचे आजोबा यशवंत पुजारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. पोलिस आयुक्तालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शहरात आले असता त्यांनी गुरुवारी सायंकाळी निवेदन दिले.
टिळकनगर येथील रहिवासी वर्धन घोडे या दहा वर्षाच्या मुलाचा पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सोमवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी अभिलाष मोहनपूरकर व श्याम मगरे यांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, मात्र आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना कोणतीही दयामाया दाखवू नये, अशी मागणी यशवंत पुजारी यांनी केली. त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्याची व्यासपीठावर भेट घेतली. दरम्यान, वर्धन घोडे याचे वडिल विवेक घोडे यांचा सहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या खुनाच्या तपासाची कागदपत्रे मिळवण्यासाठी जवाहरनगर पोलिसांनी कळवा पोलिस ठाण्याशी संपर्क केला आहे. दरम्यान, संशयित आरोपी अभिलाष मोहनपूरकर वापरत असलेल्या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे. वर्धन घोडे खून प्रकरणातील दोन संशयित आरोपींपैकी एक श्याम मगरे हा मुंबईवरून काही दिवसापूर्वी शहरात आला आहे. घोडे कुटुंब ठाणे, कळवा येथील मनीषानगर भागात अक्षय सोसायटीमध्ये राहत होते. वर्धनचे वडील विवेक घोडे यांच्यावर २२ फेब्रुवारी २०१० रोजी सकाळी साडेसात वाजता गोळ्या झाडण्यात आल्या. विवेक हे ठाणे जिल्हा काँग्रेसच्या मानवाधिकार विभागाचे कळव्याचे ब्लॉक उपाध्यक्ष होते. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान २८ फेब्रुवारी २०१० रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्धनच्या खुनाच्या घटनेशी विवेक यांच्या प्रकरणाचा काही सबंध आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. श्याम मगरेचा त्या प्रकरणाशी काही सबंध आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. संशयित आरोपी अभिलाष मोहनपूरकरकडे ओपन कार आहे. मुंबई पासिंगच्या या कारची तसेच त्याच्याकडे असलेल्या इतर वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाकडून जवाहरनगर पोलिसांनी मागविली आहे. त्याच्याकडे असलेली कार त्याने सेकंडहँड विकत घेऊन नंतर बदल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वर्धनच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, दयामाया दाखवू नका, अशी मागणी मृत वर्धन घोडे याचे आजोबा यशवंत पुजारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. पोलिस आयुक्तालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शहरात आले असता त्यांनी गुरुवारी सायंकाळी निवेदन दिले.
टिळकनगर येथील रहिवासी वर्धन घोडे या दहा वर्षाच्या मुलाचा पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सोमवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी अभिलाष मोहनपूरकर व श्याम मगरे यांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, मात्र आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना कोणतीही दयामाया दाखवू नये, अशी मागणी यशवंत पुजारी यांनी केली. त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्याची व्यासपीठावर भेट घेतली. दरम्यान, वर्धन घोडे याचे वडिल विवेक घोडे यांचा सहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या खुनाच्या तपासाची कागदपत्रे मिळवण्यासाठी जवाहरनगर पोलिसांनी कळवा पोलिस ठाण्याशी संपर्क केला आहे. दरम्यान, संशयित आरोपी अभिलाष मोहनपूरकर वापरत असलेल्या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे. वर्धन घोडे खून प्रकरणातील दोन संशयित आरोपींपैकी एक श्याम मगरे हा मुंबईवरून काही दिवसापूर्वी शहरात आला आहे. घोडे कुटुंब ठाणे, कळवा येथील मनीषानगर भागात अक्षय सोसायटीमध्ये राहत होते. वर्धनचे वडील विवेक घोडे यांच्यावर २२ फेब्रुवारी २०१० रोजी सकाळी साडेसात वाजता गोळ्या झाडण्यात आल्या. विवेक हे ठाणे जिल्हा काँग्रेसच्या मानवाधिकार विभागाचे कळव्याचे ब्लॉक उपाध्यक्ष होते. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान २८ फेब्रुवारी २०१० रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्धनच्या खुनाच्या घटनेशी विवेक यांच्या प्रकरणाचा काही सबंध आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. श्याम मगरेचा त्या प्रकरणाशी काही सबंध आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. संशयित आरोपी अभिलाष मोहनपूरकरकडे ओपन कार आहे. मुंबई पासिंगच्या या कारची तसेच त्याच्याकडे असलेल्या इतर वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाकडून जवाहरनगर पोलिसांनी मागविली आहे. त्याच्याकडे असलेली कार त्याने सेकंडहँड विकत घेऊन नंतर बदल केल्याचे पोलिसांनी सांगितले.