म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
गेल्या काही वर्षांपासून पाणी नसल्याने शेतकऱ्याना उन्हाळी कांदा पीक घेता आले नाही. यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा पीक घेतले. परंतु, भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
यंदा शेतशिवारात तुलनेने पाणी असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पिके घेतली आहेत. मात्र हंगामाच्या अखेरीस विहिरींचे पाणी कमी होत असल्याने पिकास पाणी देण्यास मर्यादा पडत आहेत. उशिरा पेरलेला गहू, हरभरा, उन्हाळी कांदा, भूईमूग या पिकांना पाणी देण्यास अडचण येत आहे. पाणी असलेल्या शेतकऱ्याकडे दुसरे शेतकरी पाणी मागत आहेत. यंदा कांद्याचे उत्पन्न चांगले निघाले असले तरी, दर घसरत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यंदा कांदा ४०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल विकला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च देखील निघू शकलेला नाही. सध्या बाजारात आलेल्या कांद्याला ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यंदा बऱ्याच वर्षानंतर शेतकऱ्यांना उन्हाळी कांद्याचे पीक घेता आले. पण, पोळ कांद्यासह उन्हाळी कांद्याचे देखील दर घसरल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला हमीभाव देण्याचा निर्णय घ्यावा.
- नासेर पटेल, टाकळी राजाराय
आवक कमी झाली की मालाचे भाव आकाशाला भिडतात. शेतीमालाचे चांगले उत्पादन आले की भाव घसरतात. यामुळए शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हमीभाव देण्याची गरज आहे. तसेच शेतीमालाची किंमत ठरविण्याचा अधिकारही मिळावा.
- शिवाजी काळे, गोळेगाव
गेल्या काही वर्षांपासून पाणी नसल्याने शेतकऱ्याना उन्हाळी कांदा पीक घेता आले नाही. यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा पीक घेतले. परंतु, भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
यंदा शेतशिवारात तुलनेने पाणी असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पिके घेतली आहेत. मात्र हंगामाच्या अखेरीस विहिरींचे पाणी कमी होत असल्याने पिकास पाणी देण्यास मर्यादा पडत आहेत. उशिरा पेरलेला गहू, हरभरा, उन्हाळी कांदा, भूईमूग या पिकांना पाणी देण्यास अडचण येत आहे. पाणी असलेल्या शेतकऱ्याकडे दुसरे शेतकरी पाणी मागत आहेत. यंदा कांद्याचे उत्पन्न चांगले निघाले असले तरी, दर घसरत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यंदा कांदा ४०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल विकला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च देखील निघू शकलेला नाही. सध्या बाजारात आलेल्या कांद्याला ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यंदा बऱ्याच वर्षानंतर शेतकऱ्यांना उन्हाळी कांद्याचे पीक घेता आले. पण, पोळ कांद्यासह उन्हाळी कांद्याचे देखील दर घसरल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला हमीभाव देण्याचा निर्णय घ्यावा.
- नासेर पटेल, टाकळी राजाराय
आवक कमी झाली की मालाचे भाव आकाशाला भिडतात. शेतीमालाचे चांगले उत्पादन आले की भाव घसरतात. यामुळए शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हमीभाव देण्याची गरज आहे. तसेच शेतीमालाची किंमत ठरविण्याचा अधिकारही मिळावा.
- शिवाजी काळे, गोळेगाव