म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील गणोरी येथे किशोरवयीन मुली व महिलांसाठी ४० दिवसांचे व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पद्मा जाधव या होत्या, तर खेरवाडी वेलफेअर असोसिएशन मुंबईचे अजित साळवे, सचिन पाटील, आरती सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
१४व्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायतच्या पुढाकाराने उपजिविका व पोषण अभियानातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. महिलांना फॅशन डिझायनिंग बेसिक टेलरिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या महिला ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदीचा ठरावाची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल महिलांनी प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी या ठरावाची अंमलबजावणी त्वरिक करावी, अशी मागणी केली. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या पथकाला पोलिसांचे पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन उपनिरीक्षक लटपटे यांनी दिले. अवैध दारू विक्रेत्यांवर धाड टाकण्यासाठी एकटीने जाऊ नये, असे आवाहन केले. याप्रसंगी उपसरपंच बाळू तांदळे, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब तांदळे, शेख अन्वर, पंडितराव जाधव, अंबादास जाधव, राजू उबाळे, नवनाथ जाधव, गोविंद अंभोरे, नितीन तांदळे आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील गणोरी येथे किशोरवयीन मुली व महिलांसाठी ४० दिवसांचे व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पद्मा जाधव या होत्या, तर खेरवाडी वेलफेअर असोसिएशन मुंबईचे अजित साळवे, सचिन पाटील, आरती सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
१४व्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायतच्या पुढाकाराने उपजिविका व पोषण अभियानातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. महिलांना फॅशन डिझायनिंग बेसिक टेलरिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या महिला ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदीचा ठरावाची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल महिलांनी प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी या ठरावाची अंमलबजावणी त्वरिक करावी, अशी मागणी केली. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या पथकाला पोलिसांचे पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन उपनिरीक्षक लटपटे यांनी दिले. अवैध दारू विक्रेत्यांवर धाड टाकण्यासाठी एकटीने जाऊ नये, असे आवाहन केले. याप्रसंगी उपसरपंच बाळू तांदळे, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब तांदळे, शेख अन्वर, पंडितराव जाधव, अंबादास जाधव, राजू उबाळे, नवनाथ जाधव, गोविंद अंभोरे, नितीन तांदळे आदींची उपस्थिती होती.