म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी सभागृहात जाणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांना पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ अडविले. या प्रकाराने शिवसेना व काँग्रेस नेते संतापले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खासदार चंद्रकांत खैरे या प्रकारामुळे संतापले त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत तणाव निर्माण झाला होता.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी वेळेबाबत कडक सूचना दिल्या होत्या. भाजप व मित्रपक्षांचे सदस्य एका लक्झरी बसमधन आले. त्यांच्यानंतर शिवसेना व काँग्रेसचे सदस्य दाखल झाले. पण त्यांनी मुख्य प्रवेशद्वारापासून पायी येणे पसंद केले. सदस्यांना संरक्षणासाठी दोन्ही बाजूंनी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. प्रशासकीय इमारतीच्या दक्षिणेकडील दरवाज्यापासून सदस्यांना ओळखपत्र व बैठकीचे पत्र तपासून सोडण्यात येत होते. सर्व सदस्यांनी फेटे परिधान केले होते. सेना - काँग्रेसचे सदस्य गेटजवळ येताच तीन वाजले होते. त्यामुळे पोलिसांनी गेट बंद करून घेतले. या प्रकाराने सदस्य आणि उपस्थित नेते कमालीचे संतापले. ही दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही. वेळेच्या आत आम्ही येऊनही तुम्ही एकेका सदस्याची ओळख विचारत आहात. अशाने प्रक्रियेला वेळ लागले. तुम्ही सरसकट ओळखपत्र तपासून सदस्यांना आत सोडा अशी मागणी करण्यात आली. पण पोलिस अधिकारी ऐकत नव्हते. हे पाहून खासदार चंद्रकांत खैरे संतापले. त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला सुनावले. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली. काही वेळातच गेट उघडण्यात आले आणि काँग्रेस - सेनेच्या सदस्यांना आत प्रवेश मिळाला.
‘भाजपकडे गृहखाते असल्याने पोलिसांच्या मदतीने आम्हाला अडविण्याचा प्रयत्न झाला असावा. हा प्रकार दुर्देवी आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्याकडे तक्रार केली. या घटनेची चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे,’ असे शिवसेना सदस्य अविनाश गलांडे यांनी सांगितले.
घोषणायुद्ध रंगले
जिल्हा परिषदेच्या आवारात निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शिवसेना आणि भाजपमध्ये घोषणायुद्ध चांगलेच रंगले. भाजप कार्यकर्ते ‘मोदी मोदी’ अशा घोषणा देत होते. समोरून शिवसैनिक ‘खैरे - दानवे जिंदाबाद’ च्या घोषणा देत होते. या घोषणायुद्धात काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले. वातावरण तणावपूर्ण बनत असल्याचे पाहून पोलिसांनी गर्दीला पांगविले. २०१२ च्या निवडणुकीत मुख्य प्रवेशद्वारातून एकाही कार्यकर्त्याला प्रवेश देण्यात आला नव्हता. यावेळी मात्र मुक्तप्रवेश दिल्याने चहूबाजूंनी गर्दी झाली होती.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी सभागृहात जाणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांना पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ अडविले. या प्रकाराने शिवसेना व काँग्रेस नेते संतापले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खासदार चंद्रकांत खैरे या प्रकारामुळे संतापले त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत तणाव निर्माण झाला होता.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी वेळेबाबत कडक सूचना दिल्या होत्या. भाजप व मित्रपक्षांचे सदस्य एका लक्झरी बसमधन आले. त्यांच्यानंतर शिवसेना व काँग्रेसचे सदस्य दाखल झाले. पण त्यांनी मुख्य प्रवेशद्वारापासून पायी येणे पसंद केले. सदस्यांना संरक्षणासाठी दोन्ही बाजूंनी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. प्रशासकीय इमारतीच्या दक्षिणेकडील दरवाज्यापासून सदस्यांना ओळखपत्र व बैठकीचे पत्र तपासून सोडण्यात येत होते. सर्व सदस्यांनी फेटे परिधान केले होते. सेना - काँग्रेसचे सदस्य गेटजवळ येताच तीन वाजले होते. त्यामुळे पोलिसांनी गेट बंद करून घेतले. या प्रकाराने सदस्य आणि उपस्थित नेते कमालीचे संतापले. ही दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही. वेळेच्या आत आम्ही येऊनही तुम्ही एकेका सदस्याची ओळख विचारत आहात. अशाने प्रक्रियेला वेळ लागले. तुम्ही सरसकट ओळखपत्र तपासून सदस्यांना आत सोडा अशी मागणी करण्यात आली. पण पोलिस अधिकारी ऐकत नव्हते. हे पाहून खासदार चंद्रकांत खैरे संतापले. त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला सुनावले. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली. काही वेळातच गेट उघडण्यात आले आणि काँग्रेस - सेनेच्या सदस्यांना आत प्रवेश मिळाला.
‘भाजपकडे गृहखाते असल्याने पोलिसांच्या मदतीने आम्हाला अडविण्याचा प्रयत्न झाला असावा. हा प्रकार दुर्देवी आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्याकडे तक्रार केली. या घटनेची चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे,’ असे शिवसेना सदस्य अविनाश गलांडे यांनी सांगितले.
घोषणायुद्ध रंगले
जिल्हा परिषदेच्या आवारात निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शिवसेना आणि भाजपमध्ये घोषणायुद्ध चांगलेच रंगले. भाजप कार्यकर्ते ‘मोदी मोदी’ अशा घोषणा देत होते. समोरून शिवसैनिक ‘खैरे - दानवे जिंदाबाद’ च्या घोषणा देत होते. या घोषणायुद्धात काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले. वातावरण तणावपूर्ण बनत असल्याचे पाहून पोलिसांनी गर्दीला पांगविले. २०१२ च्या निवडणुकीत मुख्य प्रवेशद्वारातून एकाही कार्यकर्त्याला प्रवेश देण्यात आला नव्हता. यावेळी मात्र मुक्तप्रवेश दिल्याने चहूबाजूंनी गर्दी झाली होती.