म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐन सणासुदीत गेल्या पाच दिवसांपासून जलवाहिन्या फुटल्यामुळे आणि गळत्यांमुळे शहरवासीयांच्या घशाला कोरड पडली आहे. महापालिका प्रशासन दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहे. मात्र, विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी बैठक केव्हा घ्यायची, याबद्दल पदाधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
दर वर्षी उन्हाळ्यात शहरामध्ये पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होते. यंदा ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून पालिकेने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच चोवीस तासांचे शटडाऊन घेऊन जलवाहिन्यांवरच्या गळत्या दुरुस्त केल्या. त्यामुळे सुमारे चार एमएलडी पाणी वाढले. या पाण्याचा दाब सहन न झाल्यामुळे जलवाहिनीला गळती लागण्याचे व जलवाहिनी फुटण्याचे प्रकार पुन्हा घडू लागले. या प्रकारामुळे गोंधळून गेलेल्या पालिका प्रशासनाने जलवाहिनींच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाच दिवसांपासून निर्जळीला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत नसल्यामुळे टँकरद्वारे पाणी मिळण्याचा मार्ग देखील बंद झाला. या प्रकारामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे.
शुक्रवारी बिडकीन जवळ जलवाहिनी फुटली. या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच चितेगावजवळ मुख्य जलवाहिनीला गळती सुरू झाली. दहा-बारा तासांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असताना हे काम लांबत गेले आणि पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी पालिकेचे प्रशासन जलवाहिनींच्या दुरुस्तीच्या कामात गुरफटून गेले. पाच-पाच दिवस पाणीपुरवठा होत नसला तरी त्याची दखल पाणीपुरवठा विभागाने घेतली नाही. दुरुस्तीच्या कामाकडे बोट दाखवून नागरिकांना पाण्यासाठी फिरवणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पदाधिकाऱ्यांना वेळ मिळाला नाही. यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे विविध भागातील नागरिकांचे मोर्चे महापालिकेवर धडकू लागले आहेत. हर्सूल भागातील भगतसिंगनगरच्या नागरिकांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. त्यानंतर मिसारवाडी येथील महिलांनी घागर मोर्चा आणला.
पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी
सोमवारी शिवसेना महिला आघाडीच्या जयभवानीनगर, विश्रांतीनगर येथील कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या नावे निवेदन देऊन पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली. टँकरचे शुल्क कमी करा, नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करा, परिसरातील नादुरुस्त बोअरवेल दुरुस्त करा अशा मागण्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्या. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनावर सुकन्या भोसले, प्रतिभा जगताप, राखी सुरडकर, कमल बावीकर, रमेश इधाटे, राजू वाकुडे, संदीप शिंदे, तुकाराम देशमुख, विजय गावडे यांची नावे आहेत.
ऐन सणासुदीत गेल्या पाच दिवसांपासून जलवाहिन्या फुटल्यामुळे आणि गळत्यांमुळे शहरवासीयांच्या घशाला कोरड पडली आहे. महापालिका प्रशासन दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहे. मात्र, विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी बैठक केव्हा घ्यायची, याबद्दल पदाधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
दर वर्षी उन्हाळ्यात शहरामध्ये पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होते. यंदा ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून पालिकेने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच चोवीस तासांचे शटडाऊन घेऊन जलवाहिन्यांवरच्या गळत्या दुरुस्त केल्या. त्यामुळे सुमारे चार एमएलडी पाणी वाढले. या पाण्याचा दाब सहन न झाल्यामुळे जलवाहिनीला गळती लागण्याचे व जलवाहिनी फुटण्याचे प्रकार पुन्हा घडू लागले. या प्रकारामुळे गोंधळून गेलेल्या पालिका प्रशासनाने जलवाहिनींच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाच दिवसांपासून निर्जळीला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत नसल्यामुळे टँकरद्वारे पाणी मिळण्याचा मार्ग देखील बंद झाला. या प्रकारामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे.
शुक्रवारी बिडकीन जवळ जलवाहिनी फुटली. या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच चितेगावजवळ मुख्य जलवाहिनीला गळती सुरू झाली. दहा-बारा तासांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असताना हे काम लांबत गेले आणि पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी पालिकेचे प्रशासन जलवाहिनींच्या दुरुस्तीच्या कामात गुरफटून गेले. पाच-पाच दिवस पाणीपुरवठा होत नसला तरी त्याची दखल पाणीपुरवठा विभागाने घेतली नाही. दुरुस्तीच्या कामाकडे बोट दाखवून नागरिकांना पाण्यासाठी फिरवणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पदाधिकाऱ्यांना वेळ मिळाला नाही. यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे विविध भागातील नागरिकांचे मोर्चे महापालिकेवर धडकू लागले आहेत. हर्सूल भागातील भगतसिंगनगरच्या नागरिकांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. त्यानंतर मिसारवाडी येथील महिलांनी घागर मोर्चा आणला.
पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी
सोमवारी शिवसेना महिला आघाडीच्या जयभवानीनगर, विश्रांतीनगर येथील कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या नावे निवेदन देऊन पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली. टँकरचे शुल्क कमी करा, नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करा, परिसरातील नादुरुस्त बोअरवेल दुरुस्त करा अशा मागण्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्या. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनावर सुकन्या भोसले, प्रतिभा जगताप, राखी सुरडकर, कमल बावीकर, रमेश इधाटे, राजू वाकुडे, संदीप शिंदे, तुकाराम देशमुख, विजय गावडे यांची नावे आहेत.