म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी व आमदारांचे निलंबन मागे घ्यावे या मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे ठिकठिकाणी काही काळा वाहतूक थांबली. खुलताबाद येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सामील झाले होते.
कन्नड येथे माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते, शहराध्यक्ष राजेंद्र चौहान, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, माजी गटनेता वाल्मिक लोखंडे, जिल्हा बँकेचे संचालक अशोक मगर, सभापती सुरेश डोळस, युवक काँग्रेसचे मनोज देशमुख, अविनाश काळे, नगरसेवक अनिल गायकवाड, विक्रम चव्हाण, रत्नाकर पंडित, जिल्हा परिषद सदस्य धनराज बेडवाल, बंटी काशीनंद आदींचा सहभाग होता.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसने सिल्लोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको केला. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतमालाला योग्य भाव द्या, वाढती महागाई कमी करा, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्याला न्याय द्या, निवडणूक आश्वसानानुसार प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करा, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. नगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाध्यक्ष गणेश दौड आदींनी नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन दिले. महिला तालुका अध्यक्षा दुर्गाबाई पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, माजी पंचायत समिती सभापती कुशिवर्ताबाई बडक, राजाराम पाडळे, कृष्णा उखर्डे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान, हनिफ मुल्तानी, सलीम हुसैन आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खुलताबाद तालुक्याच्या आंदोलनात काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले. वेरूळ टी पाइंटवर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे, शहराध्यक्ष अब्दुल समद, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दिन, हाजी अकबर बेग, मुनिबोद्दिन, राष्ट्रवादी काँग्रेसेचे शहराध्यक्ष निसार पठाण, गजानन फुलारे आदी कार्यकर्ते सामील झाले. यावेळी पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी बंदोबस्त ठेवला.
पैठण बसस्थानकासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको केला. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात रवींद्र काळे, नगरसेवक अजित पगारे, हस्नोद्दीन कट्यारे, हरिपंडित गोसावी, भाऊसाहेब औटे, रामचंद्र काळे, यशवंत काळे, भिकाजी आठवले, अंबादास ढवळे, उत्तमराव जाधव, दत्ता फासाटे, अन्सार सय्यद, राजू टेकाळे, उत्तम खांडे, शिवाजी मगरे, रतन गारदे, शंकर राऊत, सुभाष काळे, ईश्वर मोरे, इम्रान कुरैशी, देविदास सोनवणे, कल्याण चौतमल, हाशम पठाण, प्रकाश निवारे, गणेश पवार, सरपंच अशोक जाधव, बिलाल पठाण, विठ्ठल औटे, उदयसेन काळे, मोबीन सय्यद, प्रल्हाद सोनवणे, संभाजी काळे, बाळू राऊत, नासेर सय्यद, दादासाहेब सोनवणे, इनायत पठाण यांनी भाग घेतला.
फुलंब्री येथील खुलताबाद टी पॉइंटवर तालुका काँग्रेसतर्फे रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाजार समिती सभापती संदीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, सुभाषराव गायकवाड, सिद्धेश्वर भागवत, लहू मानकापे, भैय्यासाहेब जाधव, मंगेश मेटे, त्रिंबक नागरे, सदाशिव विटेकर, प्रभाकर सोटम, महादू डकले, साहेबराव डकले, सय्यद इफ्तेखार, अजय शेरकर, मोबीन पाशा, सद्दाम पटेल, जनार्दन तुपे, शिवाजी चव्हाण आदी सामील झाले.
शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी व आमदारांचे निलंबन मागे घ्यावे या मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे ठिकठिकाणी काही काळा वाहतूक थांबली. खुलताबाद येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सामील झाले होते.
कन्नड येथे माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते, शहराध्यक्ष राजेंद्र चौहान, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, माजी गटनेता वाल्मिक लोखंडे, जिल्हा बँकेचे संचालक अशोक मगर, सभापती सुरेश डोळस, युवक काँग्रेसचे मनोज देशमुख, अविनाश काळे, नगरसेवक अनिल गायकवाड, विक्रम चव्हाण, रत्नाकर पंडित, जिल्हा परिषद सदस्य धनराज बेडवाल, बंटी काशीनंद आदींचा सहभाग होता.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसने सिल्लोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको केला. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतमालाला योग्य भाव द्या, वाढती महागाई कमी करा, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्याला न्याय द्या, निवडणूक आश्वसानानुसार प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करा, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. नगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाध्यक्ष गणेश दौड आदींनी नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन दिले. महिला तालुका अध्यक्षा दुर्गाबाई पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, माजी पंचायत समिती सभापती कुशिवर्ताबाई बडक, राजाराम पाडळे, कृष्णा उखर्डे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान, हनिफ मुल्तानी, सलीम हुसैन आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खुलताबाद तालुक्याच्या आंदोलनात काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले. वेरूळ टी पाइंटवर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे, शहराध्यक्ष अब्दुल समद, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दिन, हाजी अकबर बेग, मुनिबोद्दिन, राष्ट्रवादी काँग्रेसेचे शहराध्यक्ष निसार पठाण, गजानन फुलारे आदी कार्यकर्ते सामील झाले. यावेळी पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी बंदोबस्त ठेवला.
पैठण बसस्थानकासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको केला. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात रवींद्र काळे, नगरसेवक अजित पगारे, हस्नोद्दीन कट्यारे, हरिपंडित गोसावी, भाऊसाहेब औटे, रामचंद्र काळे, यशवंत काळे, भिकाजी आठवले, अंबादास ढवळे, उत्तमराव जाधव, दत्ता फासाटे, अन्सार सय्यद, राजू टेकाळे, उत्तम खांडे, शिवाजी मगरे, रतन गारदे, शंकर राऊत, सुभाष काळे, ईश्वर मोरे, इम्रान कुरैशी, देविदास सोनवणे, कल्याण चौतमल, हाशम पठाण, प्रकाश निवारे, गणेश पवार, सरपंच अशोक जाधव, बिलाल पठाण, विठ्ठल औटे, उदयसेन काळे, मोबीन सय्यद, प्रल्हाद सोनवणे, संभाजी काळे, बाळू राऊत, नासेर सय्यद, दादासाहेब सोनवणे, इनायत पठाण यांनी भाग घेतला.
फुलंब्री येथील खुलताबाद टी पॉइंटवर तालुका काँग्रेसतर्फे रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाजार समिती सभापती संदीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, सुभाषराव गायकवाड, सिद्धेश्वर भागवत, लहू मानकापे, भैय्यासाहेब जाधव, मंगेश मेटे, त्रिंबक नागरे, सदाशिव विटेकर, प्रभाकर सोटम, महादू डकले, साहेबराव डकले, सय्यद इफ्तेखार, अजय शेरकर, मोबीन पाशा, सद्दाम पटेल, जनार्दन तुपे, शिवाजी चव्हाण आदी सामील झाले.