म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
निसर्गच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात यावे, या मागणीसाठी तालुका शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयसमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रभारी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना निवेदन देण्यात आले. पेरणी, मशागत यासाठी खासगी व सरकारी बँकांचे उंबरठे झिजवून उत्पादन कमी झाल्यावर शेतकरी त्रस्त होत आहे. सततच्या नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाईक म्हणून प्रत्येकांने कर्जमाफीबाबत आग्रही भूमिका घेणे गरजेचे आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना गटनेते सुनील मिरकर, शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, किसान सेना तालुकाप्रमुख कैलास वराडे, युवासेना शहरप्रमुख आशीष कुलकर्णी, उपशहरप्रमुख रवींद्र सोनवणे, सचिन अग्रवाल, संजय कळात्रे, उत्तम शिंदे, सतीश सिरसाठ, किरण सिरसाठ, कैलास जयभाय, रामेश्वर एंडोले, दशरथ बर्डे, संतोष बुजाडे, प्रकाश बंब, श्याम जायभाये, गोपाल मंडावत, पांडुरंग पवार आदिंची उपस्थिती होती.
निसर्गच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात यावे, या मागणीसाठी तालुका शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयसमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रभारी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना निवेदन देण्यात आले. पेरणी, मशागत यासाठी खासगी व सरकारी बँकांचे उंबरठे झिजवून उत्पादन कमी झाल्यावर शेतकरी त्रस्त होत आहे. सततच्या नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाईक म्हणून प्रत्येकांने कर्जमाफीबाबत आग्रही भूमिका घेणे गरजेचे आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना गटनेते सुनील मिरकर, शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, किसान सेना तालुकाप्रमुख कैलास वराडे, युवासेना शहरप्रमुख आशीष कुलकर्णी, उपशहरप्रमुख रवींद्र सोनवणे, सचिन अग्रवाल, संजय कळात्रे, उत्तम शिंदे, सतीश सिरसाठ, किरण सिरसाठ, कैलास जयभाय, रामेश्वर एंडोले, दशरथ बर्डे, संतोष बुजाडे, प्रकाश बंब, श्याम जायभाये, गोपाल मंडावत, पांडुरंग पवार आदिंची उपस्थिती होती.